25 September 2017

॥ अमृतबोध ॥ जागर आदिशक्तीचा- २५ सप्टेंबर २०१७

देवीच्या नवरात्रात जोगवा मागण्याची प्रथा आहे. जसा नवस केलेला असेल त्याप्रमाणे किंवा जी काय रूढी असेल त्यानुसार ओला किंवा कोरडा जोगवा मागतात. मात्र हा जोगवा पाचच घरी मागायचा असतो. घरोघरी मागितल्यास ती भीक होईल. जोगवा म्हणजे नुसती भिक्षा किंवा माधुकरी नव्हे. त्याला खोल अर्थ आहे.
ज्याला आपले शाश्वत कल्याण व्हावे असे वाटते, त्याने श्रीसद्गुरूंना शरण जाऊन त्यांना शक्तिजागृतीरूपी जोगवा मागायचा असतो. पण हा मागण्याचा अधिकार कोणाला? प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे स्पष्ट करतात की, श्रद्धेने व भक्तियुक्त अंत:करणाने, प्रेमाने नित्य साधना करणारा असा तो भक्त हवा. तोच खरोखर जोगवा मागू शकतो. अशा भक्ताने श्रीगुरूंजवळ आईचा जोगवा म्हणून काय याचना करायची? तर, " माझ्या शरीरात सुप्त असलेली भगवती शक्ती जागृत करून द्या. त्यासंबंधी ज्ञान व युक्ती द्या. मला साधनापथ दाखवा ! "
असा जोगवा मागितल्यावर श्रीगुरु कृपावंत होऊन त्या भक्ताला प्रेममुद्रा प्रदान करतात आणि मगच त्याचा परमार्थ ख-या अर्थाने सुरू होतो. जागृत झालेली कृपाशक्ती मग त्याच्या पंच महाभूतांची आटणी करते. त्या भक्ताचे सर्व दोष हळूहळू काढून टाकून, त्याचे प्राण, इंद्रिये व पांचभौतिक शरीर यांची आटणी म्हणजेच शुद्धी करते !
उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो ।
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates