Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज
Read More
प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

15 July 2020

॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥

॥ अमृतबोध ॥

॥ हरिपाठ मंजिरी - २००  ॥

श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झालेले सोने दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याचे काही सोने करू शकत नाही. म्हणून सर्वांनाच स्वत:च्या मुक्तीनंतर इतरांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान मिळणे ही फार महत्त्वाची स्थिती आहे. म्हणूनच श्री तुकोबाराय महाराज म्हणतात, "सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्यारें होऊं नका रानभरी ॥"
असा जाणत्या व दावित्या सद्गुरूंकडून ज्याला श्रीगुरुकृपेचा लाभ झाला नाही ; म्हणजेच श्रीगुरूंच्या कृपेने जीवात्म्यास 'सुषुम्ना मार्ग' (म्हणजेच 'वाट') ; ज्या वाटेने जायचे व परमात्मरूप व्हायचे ; ती वाट सापडवून दिली जात नाही, तोपर्यंत अद्वैत सिद्धांताचे ज्ञान होणार नाही व ते ज्ञान ज्याला नाही, 'त्यां कैचे कीर्तन घडे नामी ?' त्याला खऱ्या अर्थाने कीर्तन घडणार नाही, असे श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील तिसऱ्या चरणात सांगतात.
आता 'खरे कीर्तन किंवा संकीर्तन' म्हणजे काय ? हे प.पू.श्री.मामा सविस्तर सांगतात, ते आपण उद्यापासून पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

14 July 2020

॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - १९९ ॥

॥ अमृतबोध ॥

॥ हरिपाठ मंजिरी - १९९  ॥

सद्गुरु श्री माउलींनी हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात "गुरुविणें ज्ञान" असे जे म्हटले आहे, त्याच संदर्भाने श्रीसंत तुकाराम महाराजही म्हणतात की, "सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । ( स.सं.तु.३५४३.२)" म्हणजे सापडवून दिलेल्या वाटेने गंगास्नानास जाताना ते अनुभविता येईल. 
परंतु लोक हा अभंग म्हणताना, 'सापडली वाट' असे म्हणतात. तर ते तसे नाही. कारण श्रीसंत तुकोबारायांना वाट 'सापडली' नाही, तर त्यांच्या श्रीसद्गुरुरायांनी ती त्यांना 'सापडवून दिली'. ही वाट आपली आपल्याला कधीच सापडत नसते, ती श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दाखवून द्यायची, सापडवून द्यायची असते.
म्हणून त्याच अभंगात पुढे श्रीतुकोबाराय म्हणतात की, "मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।" त्यांच्या मस्तकावर त्यांचे सद्गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांनी "जाणता कर" ठेवला. म्हणजे त्यांच्या श्रीगुरूंकडून त्यांना अद्वैताची अनुभूती मिळाली असून, ती अनुभूती पुन्हा इतरांना देण्याची कला देखील सांगितली गेली आहे. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

13 July 2020

॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥

॥ अमृतबोध ॥

॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" श्रीगुरूंच्या कृपेशिवाय द्वैताची झाडणी होणार नाही. पण त्यासाठी ते श्रीगुरु आधी पूर्ण अनुभवी असावे लागतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत. 
एकदा एका मनुष्याला काही दोषाने एका वस्तूच्या जागी दोन दोन वस्तू दिसू लागल्या. तेव्हा तो एका नेत्रतज्ज्ञाकडे गेला व आपल्याला काय होते आहे ते सांगू लागला. तेव्हा तो नेत्रतज्ज्ञ त्याला म्हणाला, "एवढ्या साध्या गोष्टीसाठी तुम्हा तिघे कशाला आलात ?" कारण त्या वैद्यालाच एका वस्तूच्या तीन वस्तू दिसत असत !
आता विचार करा, अशा तीन वस्तू दिसणाऱ्या वैद्याकडून ज्याला इलाज करून घ्यायचा आहे, त्याची योग्य चिकित्सा होईल का कधी ? म्हणूनच श्री माउली म्हणतात की, "गुरुविणें ज्ञान ।" श्रीगुरु असे हवेत की ज्यांची नुसती दृष्टीच अद्वैती नसून, अनुभूतीही तीच आहे. त्यांना शरण गेल्यास साधकालाही तीच दृष्टी लाभेल. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

4 July 2020

अमृतबोध ॥ ४ जुलै ॥ हरिपाठ मंजिरी - १९७ ॥



सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" यातील 'द्वैताची झाडणी'चा मार्मिक अर्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागेल. जसे सोनाराची भट्टी झाडली की तेथे सोन्याचांदीचे कण दिसू लागतात किंवा आरशावरची धूळ झाडली की आपलाच चेहरा उत्तम दिसू लागतो. त्याप्रमाणे द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागते.
भ्रमामुळे एकाचे दोन दिसते. तो डोळ्यांतील दोष वैद्याकडून काढून घेतला म्हणजे, जरी डोळे दोन असले तरी दिसते एकच. दोन टिपऱ्या असल्या तरी नाद एकच निघतो त्यांतून. किंवा पाय दोन असले तरी चाल एकच असते. तसेच द्वैत झाडल्यावर हे अद्वैत स्पष्ट दिसू लागते.
जसा डोळ्यांचा दोष अनुभवी वैद्य दूर करतो, तसाच हा द्वैताचा दोष केवळ अनुभवी श्रीसद्गुरूच दूर करतात. त्या सद्गुरूंची दृष्टीच नुसती अद्वैती नसते तर त्यांना तसाच अनुभवही असतो. अशा सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने गेल्यास साधकालाही तीच दृष्टी प्राप्त होते. म्हणूनच श्री माउली पुढे "गुरुविणें ज्ञान" असे म्हणतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत. ती आपण पुढच्या भागात पाहू या.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
Read More

2 July 2020

॥ अमृतबोध ॥ २ जुलै ॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥

॥ अमृतबोध ॥

२ जुलै

॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, "रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥" या चरणाची सुरेख संगती लावताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "राम किंवा कृष्ण हे दोनही विष्णू या सर्वव्यापी तत्त्वातून आलेले असल्यामुळे त्यांच्यात अभेद आहे. पण ते न जाणता एकाने म्हणावे कृष्ण हाच मोठा व तोही बाळकृष्णच ; तर दुसऱ्याने म्हणावे रवी हातात घेतलेला कृष्णच मोठा. तिसऱ्याने अजून तिसरेच म्हणावे. हे काही खरे नाही. 
भगवद् पूज्यपाद श्रीमद् आद्य शंकराचार्य महाराज श्रीशंकरांच्या मंदिरात गेले तर तदाकार होतील यात शंका नाही. कारण त्यांचा अवतारच त्यासाठी. परंतु तेच श्रीअन्नपूर्णेच्या मंदिरात गेले तरी लगेच तदाकार होऊन, "अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।" असे म्हणतात. पंढरीला गेले की विष्णूंच्या पंढरीनाथ या अवताराला पाहून "महायोगपीठे तटे भीमरथ्या ।" म्हणून तितक्याच प्रेमाने वंदन करतात. कारण त्यांना तेथे ब्रह्मस्वरूपाचाच अनुभव येतो, वेगळेपणा जाणवतच नाही. म्हणजे असा एकत्वाचा अनुभव ज्याला येईल तोच धन्य, तोच खरा ज्ञानी होय ! 
हे सोडून ज्याला एकदेशीय ज्ञान होते, त्याला ते अद्वैत तत्त्व, (राम व कृष्ण किंवा सर्व देवदेवता हे मुळात एकाच परब्रह्माची रूपे आहेत हे, ) "कैसेनि पैठें होय ?" म्हणजे कसे आत्मसात् होईल ? असे श्री माउली या चरणात विचारतात. 
आता हे 'अद्वैत' समजण्यासाठी, म्हणजेच 'द्वैताची झाडणी' होण्यासाठी काय करायला हवे ? हे श्री माउली अभंगांच्या तिसऱ्या चरणात सांगतात, ते आपण उद्या जाणून घेऊ या.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates