॥ अमृतबोध ॥
॥ हरिपाठ मंजिरी - १९९ ॥
सद्गुरु श्री माउलींनी हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात "गुरुविणें ज्ञान" असे जे म्हटले आहे, त्याच संदर्भाने श्रीसंत तुकाराम महाराजही म्हणतात की, "सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । ( स.सं.तु.३५४३.२)" म्हणजे सापडवून दिलेल्या वाटेने गंगास्नानास जाताना ते अनुभविता येईल.
परंतु लोक हा अभंग म्हणताना, 'सापडली वाट' असे म्हणतात. तर ते तसे नाही. कारण श्रीसंत तुकोबारायांना वाट 'सापडली' नाही, तर त्यांच्या श्रीसद्गुरुरायांनी ती त्यांना 'सापडवून दिली'. ही वाट आपली आपल्याला कधीच सापडत नसते, ती श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दाखवून द्यायची, सापडवून द्यायची असते.
म्हणून त्याच अभंगात पुढे श्रीतुकोबाराय म्हणतात की, "मस्तकीं तो जाणा ठेविला कर ।" त्यांच्या मस्तकावर त्यांचे सद्गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांनी "जाणता कर" ठेवला. म्हणजे त्यांच्या श्रीगुरूंकडून त्यांना अद्वैताची अनुभूती मिळाली असून, ती अनुभूती पुन्हा इतरांना देण्याची कला देखील सांगितली गेली आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment