28 June 2016

॥ अमृतबोध ॥ २८ जून २०१६

॥ अमृतबोध ॥
२८ जून २०१६
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज हे भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे निष्ठावंत वारकरी. त्यांनी सलग ५३ वर्षे माउलींसोबत पंढरीची वारी केली. एवढेच नाहीतर वारीच्या नित्यक्रमात म्हटल्या जाणा-या आंधळा, पांगळा, वासुदेव इत्यादी प्रकारच्या गूढ योगानुभूती सांगणा-या असंख्य अभंगांवर निरूपणेही केली. संतांच्या या अभंगांवर पू. मामांशिवाय फारसे कोणी आजवर बोललेलेच नाही. ही सर्व निरूपणे श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेली असून अभ्यासकांनी वाखाणलेली आहेत.
माउलीकृपेने वारी पू. मामांच्या अंगोअंगी मुरलेली होती, म्हणून एका सच्च्या वारक-याचेच प्रामाणिक मनोगत प. पू. मामा जणू आजच्या अमृतबोधातून व्यक्त करीत आहेत. ख-या वारक-याला हरिनामाचेच व्यसन असते व तो त्याच मस्तीत, निरंतर गुरुप्रेमाच्या धुंदीतच रममाण झालेला असतो. आजचे हे अमृतवचन प. पू. मामांचेच हृदयभाव प्रकट करीत आहे.
प. पू. श्री. मामासाहेबांचे हृदय-अधिष्ठाते भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसोहळ्याचे आज प्रस्थान, त्यानिमित्त मुद्दाम हा खासा अमृतबोध !!
( अशा पोस्टस नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates