16 July 2016

॥ अमृतबोध ॥ १६ जुलै २०१६

१६ जुलै २०१६
अहंकार हा कायम घातकच असतो, मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना. संतांपाशी जगातल्या सर्व सिद्धी पाणी भरत असतात, पण त्यातही त्यांची सर्वात मोठी सिद्धी ही निरहंकार साधेपणा हीच असते. जो नम्र असतो, कृतज्ञ असतो, तोच सर्वश्रेष्ठ ठरतो, हे वेगळ्या शब्दांत पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत. निरहंकारता अंगी बाणवण्याचा सहजसोपा उपाय सांगताना पू. मामा म्हणतात की, आपल्यापाशी जे जे मानसिक, बौद्धिक, शारीरिक, वाचिक सामर्थ्य आहे ते सर्व भगवंतांचा प्रसाद समजावा, त्यात आपले कर्तृत्व मानू नये. म्हणून तो प्रसाद त्याच ईश्वराच्या संतोषासाठी व्यवहारात मनापासून वापरावा, म्हणजे त्याचा अहंकार मुळीच होत नाही व त्या विशेष शक्ती जगाच्या व स्वत:च्या भल्यासाठीच उपयुक्त ठरतात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates