2 July 2016

॥ अमृतबोध ॥ २ जुलै २०१६


२ जुलै २०१६

सकाळी ७.२८ची लोकल पकडायची असेल तर आपल्याला वारंवार त्याची आठवण करून द्यावी लागते का हो स्वत:ला? पहाटेपासूनची सगळी कामे त्यानुसार बरोबर होतात ना? पण तेच पूजा करायची असेल, पारायण करायचे असेल किंवा मंदिरात जाऊन दर्शन, सेवा करायची असेल तर किती कारणे सहज निर्माण होतात मनात? या सर्वसामान्यांच्या नेहमीच्या गोष्टीचा संदर्भ घेऊन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, प्रपंच आपोआप होतो, परमार्थ मात्र ठरवून करावा लागतो. प्रपंचात युक्ती व पैसे असावे लागतात तरच तो सुखाचा होतो आणि परमार्थात युक्ती व योग लागतो. योग म्हणजे श्रीभगवंतांच्या कृपेने सद्गुरूंशी जोडले जाणे व साधन प्राप्त होणे. तो योग जुळला की परमार्थ आनंददायक ठरतो. योग्य कौशल्याने अर्थात् युक्तीने वागणे दोन्हीकडे आवश्यकच असते.
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates