9 July 2016

॥ अमृतबोध ॥ ९ जुलै २०१६


९ जुलै २०१६
आपले मन हा अजब कारखाना आहे. त्यात सतत संकल्पविकल्प चालूच असतात. जोवर त्या मनाला आपण सतत चिंतत असलेल्या संसारातील विषयांच्या विचारांचे पाठबळ आहे तोवर ते सतत उड्या मारतेच. पण दिव्यातील तेल संपले की तो दिवा आपोआप शांत होतो, तसे हे मनही त्याचे खाद्य संपले की शांत होते. हे एकदम घडत नाही, पण हळूहळू, प्रयत्नपूर्वक घडवावे लागते. मनाची शांती ही फक्त श्रीभगवंतांच्या नामस्मरणाने व त्यांच्या चिंतनानेच मिळू शकते. म्हणून हळूहळू आपण त्याची सवय लावून घ्यावी, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगत आहेत. शांत झालेल्या मनाची ताकद हजारो पटीने वाढलेली असते, हे विसरता कामा नये. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, " मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण । सुख समाधान । जे इच्छा ते ॥ " मनाची अशी प्रसन्नता केवळ प्रभूच्या सप्रेम नामस्मरणानेच लाभते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates