Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 July 2016

॥ अमृतबोध ॥ ३१ जुलै २०१६

३१ जुलै २०१६ शरीराच्या प्रत्येक अवयवाचे एकेक भूषण सांगितलेले आहे. त्यात हातांचे भूषण ' दान ' मानले जाते. दान म्हणजे त्याग. आपली मालकी त्यागून गरजवंताला एखादी वस्तू निरपेक्षपणे व त्या देण्याविषयी अहंकाराची कसलीही भावना मनात न आणता देणे म्हणजे दान करणे होय. या दानाचे अपार महत्त्व प. पू. श्री. मामासाहेब...
Read More

30 July 2016

॥ अमृतबोध ॥ ३० जुलै २०१६

३० जुलै २०१६ आत्मपरीक्षण करणे, हा आपल्यात सुधारणा करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. पण ते कसे करायचे? हेच माहीत नसल्याने गोंधळ होतो. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आत्मपरीक्षणाची सुयोग्य पद्धत सांगताना म्हणतात की, पहिल्यांदा आपल्या मनातील सद्विचारांचा पाठपुरावा करायला शिकावे....
Read More

29 July 2016

॥ अमृतबोध ॥ २९ जुलै २०१६

२९ जुलै २०१६ शिष्याने आपल्या श्रीगुरूंच्या संपर्कात राहावे, त्यांच्या संगतीत राहावे म्हणजे त्याचा परमार्थ निर्विघ्नपणे पूर्णत्वास जातो, असे संत सांगतात. पण प्रत्येकालाच तसे जमेल असे नाही. यासाठी कोणालाही सहज जमेल असा सद्गुरुसंगतीचा राजमार्ग प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, आपल्या...
Read More

28 July 2016

॥ अमृतबोध ॥ २८ जुलै २०१६

२८ जुलै २०१६ परमार्थात ' सेवा ' फार महत्त्वाची मानलेली आहे. श्रीतुकाराम महाराज स्वानुभव सांगतात, " सेवेचिये सत्ते धनीच सेवक । " निरपेक्ष सेवेने मालकच सेवकाचा सेवक होऊन राहातो. सर्व संतांच्या चरित्रात हे पाहायला मिळते. भगवंतांनी संतांची पडेल ती सेवा केलेली आहे. म्हणूनच या अपार महत्त्वपूर्ण साधनांगाची...
Read More

27 July 2016

॥ अमृतबोध ॥ २७ जुलै २०१६

२७ जुलै २०१६ मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चार गोष्टींना मिळून अंत:करण म्हणतात. या चारही गोष्टी आपल्या चांगल्या वाईट वृत्तींमुळे कमी अधिक प्रमाणात शुद्ध-अशुद्ध असतात. यांच्यातील वाईट, पापी विचार नष्ट झाले की ते शुद्ध होतात व आनंदाची अनुभूती येऊ लागते. यासाठी श्रीभगवंतांचे दर्शन घेणे, हा मोलाचा...
Read More

26 July 2016

॥ अमृतबोध ॥ २६ जुलै २०१६

२६ जुलै २०१६ परमार्थामध्ये शहाणा कोणाला म्हणतात? याचे अतिशय समर्पक व अचूक उत्तर प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. जो आपल्या श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन त्यांनी जशी सांगितली आहे, अगदी तशीच साधना प्रेमाने करतो, तोच खरा शहाणा होय. श्रीगुरूंवर व त्यांनी दिलेल्या साधनेवर जो दृढ विश्वासून...
Read More

25 July 2016

॥ अमृतबोध ॥ २५ जुलै २०१६

२५ जुलै २०१६ संत परमार्थाबरोबर आपल्याला व्यवहाराचेही नेमके मार्गदर्शन करत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतवचनात म्हणूनच म्हणतात की, रोजच्या जीवनात, व्यवहारात आपल्या मानसिक, बौद्धिक व शारीरिक  कुवतीचा विचार करूनच वागावे, नाहीतर फजिती होते व त्यातून आलेल्या नैराश्याने...
Read More

24 July 2016

॥ अमृतबोध ॥ २४ जुलै २०१६

२४ जुलै २०१६ आपले मन हे महासामर्थ्यशाली, ताकदवान असते. जणू एखादा मत्त हत्तीच. पण हत्ती जसा माहूताच्या हातातील छोट्या अंकुशाला घाबरून सांगू तसा वागतो, तसेच हे मनही केवळ एकाच अंकुशाला घाबरते. तो अंकुश म्हणजेच श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले सिद्धनाम होय. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज...
Read More

23 July 2016

॥ अमृतबोध ॥ २३ जुलै २०१६

२३ जुलै २०१६ प्रारब्ध आजवर कोणालाही टळलेले नाही. त्यामुळे त्यात जी सुख-दु:खे लिहिलेली आहेत ती आज ना उद्या भोगाला येणारच. शिवाय ती आपणच पूर्वी शुभाशुभ कर्मे करून निर्माण केलेली आहेत. म्हणून त्यांची भीती न बाळगता समाधानात आयुष्य जगावे. आपल्या प्रारब्धातील सुखदु:खांची तीव्रता श्रीभगवंतांच्या भक्तीने,...
Read More

22 July 2016

॥ अमृतबोध ॥ २२ जुलै २०१६

२२ जुलै २०१६ देवाला नमस्कार करणे, जमेल तशी पूजा करणे इत्यादी गोष्टी या भक्तीतच मोडत असल्या तरी त्या गौण आहेत. खरा भक्त काही वेगळाच असतो. त्याचे यथार्थ लक्षण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, मासा जसा पाण्याविना तडफडतो, तसे जो भगवंतांसाठी तडफडतो, तोच खरा भक्त होय. ही स्थिती...
Read More

21 July 2016

॥ अमृतबोध ॥ २१ जुलै २०१६

२१ जुलै २०१६ अध्यात्म ही एक संपन्न जीवनशैली आहे. त्याची तत्त्वे आत्मसात होऊन रोजच्या वागण्यात उतरली तरच खरे अध्यात्म जमले. नुसत्या अध्यात्माच्या लंब्याचौड्या गप्पा मारणे हे काही अध्यात्म नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात की, गीतेत सांगितलेली दैवी गुणसंपदा, संतांच्या...
Read More

20 July 2016

॥ अमृतबोध ॥ २० जुलै २०१६

२० जुलै २०१६ साधना करतो म्हणूनच साधक या नावाने ओळख होते. म्हणजे साधना करणे हेच त्याचे कर्तव्य आहे. ग्रंथांत जगातील सर्व ज्ञान आहेच, पण नुसता त्याचा उपयोग काय? पाककृतीच्या पुस्तकात शेकडो कृती दिलेल्या असतात, त्या नुसत्या वाचून किंवा सांगून पोट भरेल का? ते स्वत: करूनच पाहायला पाहिजे. म्हणूनच साधनेचे...
Read More

19 July 2016

॥ अमृतबोध ॥ १९ जुलै २०१६

१९ जुलै २०१६ श्रीगुरुपौर्णिमा श्रीसद्गुरुचरणांना सादर वंदन ! आज श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर, श्रीगुरु भगवंतांचे अलौकिक माहात्म्य गायन करणे हे आपले सर्वांचे प्रधान कर्तव्य आहे. यासाठीच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे श्रीगुरूंच्या अवताराचे मुख्य मर्म सांगतात की, अज्ञानामुळे जीव...
Read More

18 July 2016

॥ अमृतबोध ॥ १८ जुलै २०१६

१८ जुलै २०१६ आजचा काळ हा फारच वेगळा आहे. त्यात सगळीकडेच भेसळ आहे. त्यातून परमार्थ क्षेत्रही सुटलेले नाही. त्यामुळे लोक परमार्थात ख-या संतांची, सद्गुरूंची वानवा आहे असे नेहमी ओरडतात. पण यातला पुढचा भाग प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, खरे शिष्य होण्याच्या पात्रतेचे तरी किती जण सापडतील?...
Read More

17 July 2016

॥ अमृतबोध ॥ १७ जुलै २०१६

१७ जुलै २०१६ परमार्थ आणि प्रपंच या बाह्यत: ओळखू येणा-या गोष्टी नाहीत. त्या तर आपल्या अंत:करणातील वृत्तींचे प्रतीक आहेत. टिळे माळा घालणे म्हणजे परमार्थ नाही आणि सतत पोरांबाळांच्यात रमणे म्हणजेच प्रपंच असेही नाही. शरीराने काहीही असो मनाने कशात किती गुंतलेपण आहे त्यावरून एखाद्याच्या प्रपंच परमार्थाची...
Read More

16 July 2016

॥ अमृतबोध ॥ १६ जुलै २०१६

१६ जुलै २०१६ अहंकार हा कायम घातकच असतो, मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना. संतांपाशी जगातल्या सर्व सिद्धी पाणी भरत असतात, पण त्यातही त्यांची सर्वात मोठी सिद्धी ही निरहंकार साधेपणा हीच असते. जो नम्र असतो, कृतज्ञ असतो, तोच सर्वश्रेष्ठ ठरतो, हे वेगळ्या शब्दांत पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे...
Read More

15 July 2016

॥ अमृतबोध ॥ १५ जुलै २०१६

१५ जुलै २०१६ जात, धर्म, पंथ, उच्चनीच असला कोणताही भेदभाव न करता, सर्व प्राणिमात्रांना भगवंतांचेच अंश मानून विशुद्ध प्रेमभक्तीचा मार्ग आचरणा-या भागवत-वारकरी संप्रदायाचा आज सर्वात मोठा दिवस...आषाढी एकादशी ! या संप्रदायाचे अध्वर्यू प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज संप्रदायाच्या तात्त्विक भूमिकेतून...
Read More

14 July 2016

॥ अमृतबोध ॥ १४ जुलै २०१६

१४ जुलै २०१६ विशुद्ध धार्मिकता व ईश्वरभक्ती या अतिशय सात्त्विक गोष्टी आहेत. त्या उगीच कोणालाही लाभत नाहीत. पूर्वीचे काही उत्तम संस्कार असतील व पुण्याचा संचय असेल तरच या जन्मी मनुष्याला काही प्रमाणात का होईना ईश्वरभक्ती लाभते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात. म्हणजे ज्यांच्या गाठीशी...
Read More

13 July 2016

॥ अमृतबोध ॥ १३ जुलै २०१६

१३ जुलै २०१६ संतांचा उपदेश हा अतिशय नेमका व पटणाराच असतो. ते आपल्या पोटात शिरून बरोबर सांगतात. त्या बाबतीत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा हातखंडा होता. आजचा अमृतबोध हे त्याचे देखणे उदाहरण होय. अध्यात्माची अशी चपखल मांडणी क्वचितच अन्य कोणी केली असेल. आपले जीवन ही एक गाडी असून आपले मनच...
Read More

12 July 2016

॥ अमृतबोध ॥ १२ जुलै २०१६

१२ जुलै २०१६ संत कोणाला म्हणावे? याच्या अनेक व्याख्या संतांनीच करून ठेवलेल्या आहेत. त्यांपैकी ख-या संतांचे एक सुंदर लक्षण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगत आहेत. संतांचा हात हा कायम काहीतरी देण्यासाठीच पुढे येत असतो, काही मागण्यासाठी नाही. जे सतत काहीतरी मागतात किंवा ज्यांना इतरांकडून...
Read More

11 July 2016

॥ अमृतबोध ॥ ११ जुलै २०१६

११ जुलै २०१६ जन्म आणि मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. पृथ्वीवर जन्म झाला की मृत्यू होणारच कधीतरी. त्यामुळे पूर्णपणे प्रारब्धावर, पूर्वजन्मांतील कर्मांवर अवलंबून असणा-या या अटळ गोष्टीचा संतांना कधीच विचार करावासा वाटत नाही. ते आपल्यालाही त्याचा विचार न करता, हाती असलेला प्रत्येक क्षण निरपेक्ष भावनेने...
Read More

10 July 2016

॥ अमृतबोध ॥ १० जुलै २०१६

१० जुलै २०१६ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसते तेव्हा मानसपूजा केलेली देखील चालते. उलट आपल्या आराध्याची, श्रीसद्गुरूंची मानसपूजा करणेच जास्त सोपे व सहज शक्य असते. मानसपूजेने मनाची शुद्धी होऊन परमार्थात अनेक लाभ होतात, म्हणून या उपासनेचा संत कायमच पुरस्कार करतात. प्रत्यक्ष शरीराने केलेल्या सेवेने मनाबरोबरच...
Read More

9 July 2016

॥ अमृतबोध ॥ ९ जुलै २०१६

९ जुलै २०१६ आपले मन हा अजब कारखाना आहे. त्यात सतत संकल्पविकल्प चालूच असतात. जोवर त्या मनाला आपण सतत चिंतत असलेल्या संसारातील विषयांच्या विचारांचे पाठबळ आहे तोवर ते सतत उड्या मारतेच. पण दिव्यातील तेल संपले की तो दिवा आपोआप शांत होतो, तसे हे मनही त्याचे खाद्य संपले की शांत होते. हे एकदम घडत नाही,...
Read More

8 July 2016

॥ अमृतबोध ॥ ८ जुलै २०१६

८ जुलै २०१६ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन परमार्थमार्ग आचरणा-या सर्वांसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. परमार्थ करावा असे अनेकांना मनापासून वाटते. पण कुठून सुरुवात करावी, हेच समजत नाही. अशा सर्वांसाठी व ज्यांनी...
Read More

7 July 2016

॥ अमृतबोध ॥ ७ जुलै २०१६

७ जुलै २०१६ सोन्यातील हीणकस नष्ट करण्यासाठी ते मुशीत घालून जाळतात. हीण जळून गेले की सोने शुद्ध होते. तसे प्रत्येक जीव मुळात विशुद्ध परब्रह्माचाच अंश असला तरी, तो देह धारण करतो तेव्हा त्यात संकल्पजनित वासनांचे हीण मिसळलेले असते. ते हीण तप/साधना रूपी अग्नीने जळून जाते व पुन्हा मूळचा विशुद्ध ब्रह्मस्वरूप...
Read More

6 July 2016

करुणाब्रह्म

हृदयातील अखंड भगवद् अधिष्ठानामुळे संतांना आप-पर भावनाच नसते. ज्याने लावले त्याला आणि ज्याने तोडण्यासाठी घाव घातला त्यालाही वृक्ष समानच सावली देतो; त्याप्रमाणे संत देखील सर्वांशी समान प्रेमानेच वागतात. आपल्याला कारण नसताना त्रास देणा-याला आपण सहसा सोडणार नाही, पण संत त्यालाही क्षमाच करतात. कारण संतांपाशी...
Read More

॥ अमृतबोध ॥ ६ जुलै २०१६

६ जुलै २०१६ श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले साधन हेच शिष्यासाठी सर्वस्व असायला हवे. मनापासून ते साधन करणे हीच शिष्यासाठी तीर्थयात्रा, तीर्थस्नान असते. साधना हे श्रेष्ठ आंतरिक तीर्थ आहे. तीर्थस्नानाने जसे दोष नष्ट होतात, तसे साधनेनेही आपली अंतर्बाह्य शुद्धी होते. साधनेने अशी आपल्या वासनांची कायमची...
Read More

5 July 2016

श्रीदत्तभक्तिपरं वन्दे श्रीवासुदेवसरस्वतीं गुरुम्

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांची १०२ वी पुण्यतिथी ! प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज म्हणजे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली...
Read More

॥ अमृतबोध ॥ ५ जुलै २०१६

५ जुलै २०१६ कोणी भगवे कपडे घातले की लोक त्याला संन्यासी म्हणतात. संन्यासामध्ये सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांची सेवा करणे अभिप्रेत असते. नुसते भगवे कपडे घालणे हा संन्यास नव्हेच. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधात संन्यासधर्माचे मार्मिक रहस्यच प्रकट करीत आहेत. संन्यास म्हणजे...
Read More

4 July 2016

॥ अमृतबोध ॥ ४ जुलै २०१६

४ जुलै २०१६ प्रपंचात पैसा असल्याशिवाय काहीही खरे नाही, म्हणून प्रपंचरूपी धंद्याचे पैसा हेच भांडवल आहे. ते जसजसे वाढेल तसे त्या माणसाची प्रगती झाली असे म्हणतात. परमार्थात बरोबर उलटी गती असते. आपल्या जन्माचे मूळ हे आपल्या पूर्वजन्मींच्या वासनांमधे, कर्मांमधे असते. म्हणून ती प्रारब्धकर्मे हे आपले...
Read More

3 July 2016

॥ अमृतबोध ॥ ३ जुलै २०१६

३ जुलै २०१६ ' योगक्षेम ' हा शब्द आपल्याला सवयीचा असला तरी त्याचा खरा अर्थ फारसा कोणाला माहीत नाही. " योगक्षेमं वहाम्यहम् " हे साक्षात् भगवान श्रीकृष्णांचे भक्तांना दिलेले प्रतिज्ञावचन आहे गीतेमधले. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी या शब्दाचा सुरेख आणि अभिनव अर्थ आजच्या अमृतबोधात सांगितलेला...
Read More

2 July 2016

॥ अमृतबोध ॥ २ जुलै २०१६

२ जुलै २०१६ सकाळी ७.२८ची लोकल पकडायची असेल तर आपल्याला वारंवार त्याची आठवण करून द्यावी लागते का हो स्वत:ला? पहाटेपासूनची सगळी कामे त्यानुसार बरोबर होतात ना? पण तेच पूजा करायची असेल, पारायण करायचे असेल किंवा मंदिरात जाऊन दर्शन, सेवा करायची असेल तर किती कारणे सहज निर्माण होतात मनात? या सर्वसामान्यांच्या...
Read More

1 July 2016

॥ अमृतबोध ॥ १ जुलै २०१६

१ जुलै २०१६ संत नेहमीच आपल्या हिताचे सांगत असतात. बाबापुता करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आपल्या हातून परमार्थ करवून घेत असतात. त्यांचा उपदेश कायमच अतिशय सोपा, सहज पालन करता येईल असाच असतो. त्यात काहीही क्लिष्ट नसते की कठीण नसते. उगीच घरदार सोडून, अंगाला राख फासून जंगलात जायला कधीही कोणाही...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates