16 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२१ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगात पातकी माणसाविषयी सांगताना म्हणतात, *"पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥"*
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचा अर्थ सांगतात, "पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणजे पातकांशिवाय अन्य काहीच न करणे. अशी ज्याची वृत्ती असते, त्याच्यावर ती पातके वज्रलेप होतात आणि ज्याच्या बाबतीत अशी पातके वज्रलेप झालेली असतात तोच 'अभक्त' होय. म्हणूनच माउली सांगतात की, ज्याला भक्ती नाही तो पतित अभक्त होय.
भक्ती नाही म्हणजे प्रेम नाही. कारण भक्ती ही प्रेमस्वरूप असते. यावर देवर्षी नारदांचे सूत्रच आहे. भक्ती नुसती परमप्रेमरूप नसून अमृतस्वरूपही असते, असेही ते स्पष्ट सांगतात. याचा गूढार्थ आमच्या मातु:श्री फार सुंदर सांगत असत." प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींचा तो गूढार्थ आपण उद्या सविस्तर पाहूया.
खूप जुन्या झालेल्या मूर्तींची आणखी झीज होऊ नये म्हणून विशिष्ट वनस्पती व द्रव्यांचा लेप त्यावर देतात. तो लेप इतका कठीण होऊन बसतो की मग कशाचाही दुष्परिणाम त्या मूर्तीवर होत नाही. त्याला वज्रलेप म्हणतात. माउली येथे सांगतात की अभक्तांची पातके अशी वज्रलेप होतात व नंतर ती नष्ट होणे फार अवघड होऊन बसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates