18 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२३॥*

सद्गुरु श्री माउलींची एक सुंदर ओवी प्रमाणाला घेऊन प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, ज्या बुद्धीला परमात्माच शेवट आहे, म्हणजे जी बुद्धी परमात्म्यापर्यंत पोहोचते, तीच खरी बुद्धी होय. बाकीच्या सर्व दुर्मती होत अाणि दैवहत अभक्तांच्या ठिकाणी ह्याच सर्व दुर्मती ठासून भरलेल्या असतात.
सद्गुरु श्री माउली या दैवहत माणसांची लक्षणे, सोळाव्या अध्यायात अासुरी संपत्तीचे वर्णन करताना सविस्तर सांगतात. प.पू.श्री.मामा त्याचे विवरण करताना म्हणतात, आसुरी दोषांमधील सर्वात मोठा दोष म्हणजे दंभ होय. आपल्याला पारलौकिक सुख प्रदान करणा-या धर्माची जर सतत लोकांच्यासमोर प्रसिद्धी केली, तर तो तारक धर्मच दोष निर्माण होण्यास कारण ठरतो. जसे, महापुरात बुडण्यापासून वाचवणारी नाव जर एखादा डोक्यावर वाहून नेऊ लागला तर ती हमखास त्याला बुडवते; किंवा जे अन्न मनुष्यास  जगविते तेच जर अधिक सेवन केले किंवा दृष्टाळलेले अन्न जर खाल्ले तर तेच विषाप्रमाणे मारक ठरते. स्वधर्माचरणाच्या पोकळ बडबडीने धर्माचे अधर्मात रूपांतर होते, तोच दंभ होय. असत्य गोष्टीलाच सत्य भासवणे म्हणजेच दंभ. जिचे वासरु दगावले आहे अशा गायीने दूध द्यावे म्हणून त्या मेलेल्या वासरात पेंढा भरून ते तिच्या समोर ठेवतात; तसे धर्माचरणाच्या बाबतीत खोट्याचे खरे भासवणे हेच दंभाचे लक्षण आहे आणि अभक्त व दैवहत लोक या दंभाचे ठाणच असतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates