22 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२७ ॥*

आसुरी दुर्गुणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दुर्गुण म्हणजे 'अज्ञान'. या अज्ञानाचे लक्षण सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "पाषाणाला ज्याप्रमाणे शीत-उष्ण स्पर्शाचे ज्ञान नसते, जन्मांध व्यक्तीला रात्र व दिवसातला फरक समजत नाही, स्वयंपाकातल्या पळीला निरनिराळ्या रसांची चव कळत नाही; तसे कर्तव्य व अकर्तव्याविषयी अंधळेपणा असणे हे घोर अज्ञानाचे स्वरूप होय.
लहान मुलाला स्वच्छ किंवा मळकट पदार्थांचे ज्ञान नसल्यामुळे, जे दिसेल ते तोंडात घालावेसे वाटते; त्याप्रमाणे पाप-पुणात्मक कर्मांचा एकच खिचडा करून खाताना ज्याच्या बुद्धीला त्याज्य किंवा ग्राह्य यांचा विचारच राहात नाही; अशी स्थिती हेच नि:संशय अज्ञान होय.
या सर्व दोषांमुळे दैवहत पुरुषांच्या ठायी पूर्ण भराला आलेली 'आसुरी संपत्ती' बलवत्तर ठरते. दिसायला लहान असली तरी ती अत्यंत विषारीच असते. म्हणून परमार्थात यश मिळवू इच्छिणा-या साधकांनी पूर्ण प्रयत्नाने या दोषांपासून दूरच राहिले पाहिजे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates