23 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२८ ॥*

आसुरी संपत्तीच्या दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य (कठीणपणा) व अज्ञान या सहा दोषांची लक्षणे सद्गुरु श्री माउलींनी सविस्तर सांगितलेली आहेत. त्यांची दाहकता सांगताना पुढे ते म्हणतात, "प्रलयकाळचा अग्नी, समुद्रातला वडवाग्नी व विद्युतअग्नी हे दिसायला अवघे तीनच असले, तरी एका पंक्तीला जेवायला बसले तर त्यांना संपूर्ण विश्व सुरुवातीच्या प्राणाहुतीलाही  पुरणार नाही. कफ, पित्त व वात हे दोष तीनच; पण ते खवळले तर ब्रह्मदेवांना शरण जाऊनही मरण चुकत नाही. मग या तिघांहूनही दुप्पट सामर्थ्य असणारे हे सहा दोष आवरणे किती कठीण ठरेल?
एकाच राशीला क्रूर ग्रहांचा मेळावा जमावा, मृत्युसमयी सर्व रोगांनी शरीर व्यापावे, चोरांवरच विश्वास टाकल्याने त्यांचे फावावे किंवा थकला-भागलेला महापुरात सापडावा; तसे हे साही दोष मनुष्याचे अकल्याण करतात.
ज्याच्या सर्वनाशाचा समय जवळ आलेला असतो त्यालाच हे बरोबर जडतात. मोक्षमार्गालाही लागलेला मग त्यांच्यामुळे पुन्हा संसाराच्या गर्तेत बुडून जातो. या सहाही दोषांनी भरलेल्या दैवहत अभक्ताची पापे वज्रलेप होऊन बसतात व त्याच्या सुटकेची शक्यताच पूर्ण मावळते. म्हणून शहाण्या माणसाने यांच्यापासून सांभाळूनच राहिले पाहिजे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates