6 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १११ ॥*

साधूंच्या संगतीत राहिल्याने आपल्यामध्ये पालट होतोच. ही साधुबोध होण्याची प्रक्रिया कशी असते? हे सांगताना प.पू.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींचा एक बहारीचा अभंगचरण समोर ठेवतात.
*याकारणें श्रीगुरुनाथु ।*
*जंव मस्तकीं न ठेवि हातु ।*
*निवृत्तिदास असे विनवितु ।*
*तंव निवांत केवि होय ॥*
याचा अर्थच असा की, संतांच्या संगतीत राहावे व चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहावी. साधूंना जेव्हा वाटेल की हा आता योग्य झाला आहे, तेव्हा ते त्याच्या मस्तकावर हात ठेवतात; किंवा त्याच्यावर कृपाकटाक्ष टाकतात; किंवा त्याच्याबद्दल मनात संकल्प करतात; किंवा त्याला एकाक्षर मंत्राचा बोध करतात व त्याचा उद्धार करतात.
साधू आपल्या शिष्याला शब्दज्ञान सांगत बसत नाहीत; तर आपल्या शक्तियुक्त व ज्ञानयुक्त बलाने त्याच्यातील सुप्त शक्ती जागवतात व युक्तीने त्यास अभ्यास करावयास लावतात. हीच सर्व ख-या साधूंची बोध करण्याची पद्धत असते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

1 comment:

  1. शक्तिपात योगाची स्पर्श दीक्षा यामध्ये समाविष्ट होते कां ? कृपया स्पष्टीकरण करावे

    ReplyDelete

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates