8 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११३ ॥*

साधुबोध झाल्यानंतर आसनावर बसून साधना करू लागल्यावर निश्चलतेचा अनुभव येतो. अशा प्रकारची ती पूर्ण एकाग्रता होईपर्यंत वाट पाहावी; आणि त्या भावनेतच आसनावर बसून राहावे. मनाची तन्मयता होऊ लागली म्हणजे शरीर त्याबरोबर हलके होऊ लागते अाणि प्राणशक्ती एकवटू लागते. इंद्रियांची बाह्य प्रवृत्ती मोडून अंतर्मुखता येते आणि तो साधक समाधी लागण्याच्या बेतात येतो.
असा हा अभ्यास केवळ त्या प्रथमच्या प्रेमभावाने केलेल्या सद्गुरुस्मरणातच सिद्ध होत असतो. म्हणून हा साधुबोध होणे हेच परमार्थाचे अत्यंत आवश्यक असे प्रधान अंगच आहे; असे प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात.
आपल्या इंद्रियांना सतत बाहेरच्या बाजूने विषयांचा शोध घ्यायची सवय असते. त्यामुळे ती इंद्रिये बहिर्मुखच असतात. साधुबोध झाल्यावर पहिल्यांदा ती इंद्रिये आत पाहू लागतात. खरा आनंद तर आतच आहे, बाहेर विषयांमध्ये त्या आनंदाचा व्यर्थ आभास अाहे, हे त्यांना त्यामुळे हळूहळू समजून येऊ लागते व मग त्यांना अभ्यासाची गोडीही लागते. ती गोडी लागावी म्हणून आपणही वारंवार तेच अनुभवसुख आपल्या मनाला दाखवीत राहावे लागते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates