29 April 2017

॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३४ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमार्थाचा सुयोग्य अधिकारी कसा असतो, हे सांगताना म्हणतात, "ज्याच्या तपाचा पाया भक्कम असेल, त्या पायावर गुरुभक्तीरूपी सुंदर मंदिर उभारलेले असेल, त्या मंदिराचे श्रवणेच्छारूपी दरवाजे सदैव उघडे असून अनिंदकपणाचा कळस त्या मंदिरावर चढविलेला असेल, अशा भक्ताला परमार्थाचा उत्तम अधिकारी म्हणतात. त्याच्याच अंत:करणरूपी मंदिरात श्रीभगवंत स्वयमेव प्रकट होत असतात. तोच गीता श्रवणाचाही अधिकारी समजावा.
पण नुसते ग्रंथ वाचून केवळ पोपटपंची करणारे, अनुभव नसताना पुस्तकी ज्ञान पाजळणारे लोक काहीच कामाचे नसतात. त्यांना कधीच श्रीगोपाळ भगवंतांची प्राप्ती होत नसते; असे श्री माउली अभंगाच्या तिस-या चरणात सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates