19 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५३ ॥*

श्रीभगवंत अर्जुनाला ख-या महात्म्यांची लक्षणे सविस्तर सांगत आहेत. देव म्हणतात, "ते महात्मे ज्ञानाच्या श्रेष्ठ अनुभवाला पावून, आपल्या ठायी शोभणा-या दैवी प्रकृतीला सतेजता आणून आणि सर्व जग मद्रूप जाणून, नित्य वाढत्या भक्तिभावाने सतत माझे अनुसंधान करतात."
ज्ञानाची श्रेष्ठ भूमिका म्हणजे, मी भगवत्स्वरूप आहे हे जाणणे, *"अहं ब्रह्मास्मि ।"* चे ज्ञान होणे. या भूमिकेला पोहोचूनही महात्म्यांची भक्तिभावना काही कमी होत नाही. मी अाणि माझे भगवंत एकच आहोत, हे जाणूनही त्यांचा प्रेमभाव सतत वाढताच राहतो. त्यांचे श्रीभगवंतांचे अनुसंधान त्या ज्ञानामुळे संपून न जाता, उलट अधिक गहिरे होत जाते. यालाच श्री माउली 'अद्वैती भक्ती' म्हणतात. ही 'ज्ञानोत्तर भक्ती'च खरी भक्ती होय. असे महात्मे हे आपल्या ठायी त्या भक्तीमुळे प्रकटलेल्या दैवी सद्गुणांना आणखी उजाळा आणतात. ते दैवी गुण या महात्म्यांच्या ठायी प्रकटल्यानेच अधिक शोभिवंत होतात, असे प्रत्यक्ष गुणनिधी श्रीभगवंत सांगत आहेत.
असे आत्मज्ञान होण्यापूर्वी केल्या जाणा-या व तुम्ही आम्ही नेहमी करीत असलेल्या गौणीभक्तीलाच 'उपासना' म्हटले जाते. ज्ञानापूर्वीची ती उपासना, ज्ञानोत्तर ती भक्ती; असेच शास्त्रप्रमाण आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates