5 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४० ॥*

हरिपाठाच्या आठव्या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज पुढे सांगतात, "नामस्मरण हेच सर्व साधनांचे सारभूत साधन अाहे व त्याचा जे आश्रय करतात, ते या द्वैतभ्रांतीच्या बंधनात सापडत नाहीत. वैष्णवजनांना या नामामृताची खरी गोडी लागल्यामुळे, योग्यांना लाभणा-या सतराव्या जीवनकलेचा लाभ झाल्याप्रमाणे अमरत्वाला पावले."
श्रीभगवंतांकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत आणि सर्वच मार्ग जरी ज्याच्या त्याच्या रुचीनुसार चांगले असले, तरीही त्या सर्वांचे सार हे नामस्मरणच होय. या साधनाचा जे मनापासून आश्रय करतात, त्यांना द्वैताची भ्रांती उरत नाही, ते श्रीहरींशी एकरूपच होऊन जातात. वैष्णवजनांना या नामरूपी अमृताची खरी गोडी नेमकी कळल्यामुळेच, ते हरिभक्तही योग्यांप्रमाणे सतराव्या जीवनकलेचा लाभ घेऊन अमर झालेले आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates