3 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३८ ॥*

प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे एक कथा सांगत असत. एका मनुष्याने आपला सगळा ठेवा पुरून ठेवलेला होता. पण तो अकाली मेला. नंतर तोच त्या ठेव्यावर पिशाच होऊन बसून राहिला. खुद्द त्याचा मुलगा ते द्रव्य घ्यायला आला तरी तो त्याला छळू लागला. तसे मनुष्याने ज्या वासना निर्माण केलेल्या आहेत, त्यांचेच भूत त्याच्याच ठेव्यावर बसते. म्हणूनच सामान्यांना तो ठेवा मिळू शकत नाही.
पुढे मग तो मुलगा एका निष्णात मांत्रिकाकडे जाऊन पिशाचाचा बंदोबस्त करतो आणि मग ते द्रव्य त्याच्या हाती येते. तसे हा जो आत्मा-निधान आहे, त्याच्यावर आपल्याच वासनेचे भूत बसलेले आहे. ते जाण्यासाठी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून शक्ती, युक्ती व ज्ञान मिळवून साधना करावी लागते. त्या साधनेने वासनांचे भूत जळून खाक होते व तो आत्मठेवा प्राप्त होतो. एकदा का ते आत्म-निधान लाभले की मग मनुष्य आनंदाची अनुभूती घेऊन त्यातच कायमचा रमून जातो. हेच सद्गुरु श्री माउलींचे या सातव्या अभंगातून आपल्याला सांगणे आहे !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates