1 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३६ ॥*

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींची एक सुंदर ओवी सांगून अध्यात्माचे मुख्य दोन डोळे कोणते? त्याचे मार्मिक विवरण करतात. श्री माउली अभक्ताचे वर्णन करताना म्हणतात की, *"उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥ज्ञाने.१३.११.८२७॥"* उपनिषदे अर्थात् ज्ञान हा साधकाचा एक डोळा तर योगशास्त्र हा दुसरा डोळा आहे. याच दोन मुख्य डोळ्यांच्या साहाय्याने साधकाला आत्मस्वरूप स्पष्ट दिसते. या दोन्ही गोष्टी सद्गुरुकृपेनेच लाभतात.
सद्गुरुमुखाने प्राप्त झालेले उपनिषदांतील ज्ञान, साधनेने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पक्के व्हावे लागते. या दोन्हीची पूर्तता झाल्याशिवाय आत्मबोधाची प्रक्रियाही पूर्ण होत नसते. हेच सांगण्यासाठी  प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी देखील आपल्या 'द्विसाहस्री गुरुचरित्र' ग्रंथात 'योगरहस्य' व 'बोधरहस्य' अशी दोन स्वतंत्र प्रकरणे आवर्जून घातलेली आहेत. म्हणूनच सद्गुरु माउली हरिपाठाच्या या सातव्या अभंगात, स्वत: अनुभव घेतलेला नसताना केवळ पढिक पोपटपंची करणा-या वाचाळांना श्रीहरींची प्राप्ती कधीही होत नाही, असे स्पष्ट सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates