7 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४२ ॥*

श्रीभगवंतांचे नाम हे सर्वात सोपे साधन नक्कीच आहे, पण ते सामान्यपणे सुलभ नाही, दुर्लभच आहे. याचे कारण सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या आठव्या अभंगाच्या समारोपात सांगतात.
त्याचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, वास्तविक पाहिले तर नामस्मरण करण्याला काहीच कठीण नाही. परंतु मनुष्याची त्यावर श्रद्धाच नसल्यामुळे, ते हातून घडत नाही. त्यामुळेच त्या नामामृताची खरी गोडी लागून चटक उत्पन्न होणे, हे तर फारच दुर्घट होऊन राहिलेले आहे; असे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली स्पष्टच सांगतात.
नामसाधन सहज व सोपे असूनही केवळ आपल्या आळस आणि अश्रद्धेमुळे दुर्लभ होऊन बसलेले आहे ! ज्याची आपल्याला खरी आवड निर्माण होत नाही, त्याचे अनुसंधानही मग घडत नाही. नामामृताची गोडीच न वाटल्यामुळे त्याची चटकही लागत नाही; अाणि म्हणूनच इतके सहज-सोपे साधन उगीचच दुर्लभ झालेले आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates