23 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५७ ॥*

महात्म्यांच्या कृपेने आपोआप होणा-या संकीर्तन-भक्तीमध्ये, त्या साधकाकडून यम व नियम सहजगत्या पाळले जातात; असे सद्गुरु श्री माउली सांगतात. भगवान पतंजली महामुनींच्या योगसूत्रांनुसार, *अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच 'यम' आहेत; आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच 'नियम' आहेत.* परंतु जाबालदर्शनोपनिषदामध्ये भगवान श्रीदत्तप्रभूंनी दहा यम व दहा नियम सांगितले असून, प.प.श्री.टेंब्ये स्वामीमहाराज देखील आपल्या 'योगरहस्य' ग्रंथात तेच दहा यमनियम सांगतात.
यमांच्या माध्यमातून मनुष्याला इतर लोकांशी कसे वागावे याचा आदर्श समजून येतो. यांचे पालन केल्याने आपले इतरांशी असलेले संबंध उत्तम होतात. तर नियमांच्या पालनाने आपले आपल्या स्वत:शी असलेले वैयक्तिक वर्तन व आपले चित्त, आपले अंतरंग शुद्ध होते. या दोन्हीचा सुयोग्य परिपाक झाला की साधक पूर्ण सद्गुणी होतो व त्याला योगसाधनेचा विशिष्ट अधिकार लाभून त्याच्याकडून उत्तम साधना घडून त्याचा परमार्थ सुफळ होतो. सद्गुरु श्री माउली सांगतात की हे यमनियम संकीर्तनभक्तीत श्रीगुरुकृपेने त्या साधकाच्या ठायी आपोआपच प्रकट होत असल्याने; त्यांचे वेगळे, मुद्दाम कष्टपूर्वक आचरण करावे लागत नाही !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates