17 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५१ ॥*

महात्म्यांचे वर्तन हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महात्म्यांच्या वागण्याचे महत्त्व सांगताना म्हणतात की, "त्यांच्या सहज आचरणात नीतीला जिवंतपणा येतो !"
धर्मशास्त्र हे आचरणाचे नियम आहेत. ते सर्वच्या सर्व महात्म्यांच्याच आचरणानुसार तयार झालेले आहेत. कसे वागावे व कसे वागू नये? हे महात्म्यांच्या वागण्यावरूनच ठरवले गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्याच वागण्यातून खरी नीती जिवंत राहात असते. आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी नेहमी महात्म्यांनी आपल्या ग्रंथांमधून उपदेशिलेल्या महात्म्यांच्या आचरणानुसारच वागावे, यातच आपले शाश्वत हित आहे. महात्म्यांचे आचरण पाहून आपल्याच मनाने तसे वागायचे नसते, महात्म्यांनी जसे सांगून ठेवलेले आहे, तसेच वागावे असे प.पू.श्री.मामा आवर्जून सांगत असत, हेही विसरता कामा नये. 
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates