10 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *१० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८४ ॥*

भगवान श्री माउलींनी गीतेच्या बाराव्या अध्यायातील तेरा ते वीस या शेवटच्या आठ श्लोकांवरील टीकेत साधूंची लक्षणे फार बहारीने विवरलेली आहेत. त्यांचा सविस्तर परामर्श घेताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, खरा भक्त हाच योगी देखील असतो. त्याला कोणाचाही द्वेष करायचे ठाऊकच नसते. ज्याप्रमाणे चैतन्य सर्वांच्या ठायी समानच असते, त्याप्रमाणे तोही आपला व परका असा भेद जाणतच नाही. उत्तमाचा अंगीकार व अधमाचा तिरस्कार, ही वृत्ती पृथ्वीच्या ठिकाणी कधीच नसते, ती सर्वांनाच समान भावाने अाश्रय देते; तसे हा साधुवृत्तीचा महात्माही सर्वांनाच समान लेखून वागतो.
प्राणवायू जसा, राजाला तेवढा जिवंत ठेवीन व रंकाला वगळीन असे कधी म्हणत नाही; त्याप्रमाणे या महात्म्याची सर्वांवर सारखीच कृपा असते. पाणी कधीतरी फक्त गायीचीच तहान भागवते व वाघाला विष बनून मारते का? त्याप्रमाणे सर्व भूते एकाचीच आहेत, या भावनेने तो सर्वांवरच प्रेम करून त्यांना आधार देतो, त्यांचा उद्धारही करतो!
साधूंच्या ठायी सहजतेने विलसणारा 'समभाव' येथे सद्गुरु श्री माउलींनी उत्तम रितीने विशद करून सांगितलेला आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates