11 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *११ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८५ ॥*

साधूंची व्यवच्छेदक लक्षणे पू.मामासाहेब देशपांडे महाराज सांगत आहेत. काल आपण त्यांचा सर्वांभूती समभाव पाहिला. आता आणखी एक महत्त्वाचे लक्षण पू.मामा सांगतात, ते म्हणजे 'निरहंकारता' !
साधूंच्या ठिकाणी 'मी'पणाची वार्ताही नसते. जिथे मीपणा नाही, तिथे 'माझे'पणा तरी कसा निर्माण होणार? त्यामुळे या महात्म्याला कसल्याही माझेपणाचा मोहच नसतो.
सुख आणि दु:ख या दोन्ही वृत्ती 'मी' व 'माझे'शीच संबंधित असतात. माझेपणाच नसेल तर सुख आणि दु:ख होणार तरी कशाचे? त्यामुळे हा साधू सुख-दु:खांच्या पूर्ण पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे हीच निरहंकार वृत्ती त्याच्याठायी अपरंपार सहिष्णुता देखील निर्माण करते. सहिष्णुतेच्या बाबतीत तो पृथ्वीशी बरोबरी करू शकतो. आपण सतत पृथ्वीवर पाय देऊन सर्व व्यवहार करतो, तिच्याच जिवावर आपले सर्व चालते, पण ती कधीतरी तिच्या अंगावर पाय दिल्याची शिक्षा करते का? तसेच हा महात्मा इतरांनी दिलेला त्रास, केलेला अपमान एक शब्दही न काढता सहन करीत असतो. अंगी सामर्थ्य असतानाही बाणलेली अशी सहिष्णुताच दैवी मानली गेलेली आहे.
निरहंकारता आणि अपार सहिष्णुता या दोन्ही सद्गुणांमुळे हा साधू अखंड समाधानातच राहतो. त्याचा 'संतोष' कोणत्याही परिस्थितीत भंगत नाही. पाऊस पडो अगर न पडो, समुद्र कायम भरलेलाच असतो; तसे हा महात्मा कोणत्याच कारणाशिवायही सदैव संतुष्टच असतो.
सद्गुरु श्री माउली येथे निरहंकारता व त्यातूनच निर्माण होणारे सहिष्णुता व संतोष; असे महात्म्यांचे तीन दैवी सद्गुण विवरून सांगतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates