18 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ९२ ॥*

मेलेल्या माणसाच्या शरीराला कशाची तरी लाज वाटते का? नाही, कारण त्या शरीरात राहणा-या जीवाची त्याबद्दलची मीपणाची भावनाच संपलेली असते. तसे हे साधू सदैव ब्रह्मभावात असल्याने त्यांचा अहंकार लोप पावलेला असतो. त्यांना कसलीही टोचणी नसते किंवा कसली चिंता म्हणून त्यांना कधी सतावत नाही. इंधन संपल्यावर जसा अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे अशा साधूंच्या ठायी स्वाभाविक शांती वसत असते. ती शांतीच खरी मोक्षदायक मानलेली आहे !
मी माझे हे द्वंद्व संपले की आपोआपच श्रीभगवंतांची निखळ भक्ती उदय पावते. त्यावेळी असे महात्मे कशातही गुंतलेले नसतात. शांत झालेल्या अग्नीप्रमाणे ते सदैव ब्रह्मनिमग्नच असतात.
आज ज्यांचे पुण्यस्मरण आहे, ते महावैष्णव भागवतोत्तम श्रीसंत एकनाथ महाराज हे तर 'शांतिब्रह्म' म्हणूनच सुप्रसिद्ध आहेत. श्रीभगवद्कृपेने प्रकट होणा-या या परमशांतीचे ते महासागरच होते. त्यांच्या श्रीचरणीं आज पंचपर्वा षष्ठी निमित्त सादर दंडवत.
( *पंचपर्वा षष्ठी* - आजच्याच तिथीला श्री नाथ महाराजांचे गुरु श्रीसंत जनार्दनस्वामी यांचा जन्म, त्यांना दत्तदर्शन व त्यांचे देहविसर्जन, असे तिन्ही घडले. नाथ महाराजांची व श्री जनार्दन स्वामींची प्रथमभेट व त्यांना अनुग्रहही याच तिथीला झाला. म्हणूनच नाथांनी या पावन तिथीला गोदावरीमध्ये आपला देह विसर्जन केला; त्यामुळे या तिथीला 'पंचपर्वा षष्ठी' म्हणतात. )
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates