3 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७७ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, *"ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूंचे संगतीं तरणोपाय ॥५.४॥"* श्री माउलींना अभिप्रेत असणारे या चरणाचे मर्म सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "मुखाने हरि हरि म्हणत गेलो की त्या पुण्याईच्या बळावर कोणीतरी मार्गदर्शक भेटेल; व त्यांनी पुढील मार्ग दाखवल्यावर, त्या मार्गाने जाताना साधूंच्या संगतीत तरणोपाय होईल. सत्संग लाभला, पण तसे वागलेच नाही, तर मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही. संतांच्या नुसत्या संगतीत राहून फायदा नाही; तर ते सांगतील तसे तप करणे व तेही प्रेमाने करणे हीच खरी सत्संगती व तीच खरी 'भक्ती' होय !
यासाठीच माउली मुद्दाम शब्द वापरतात 'दृष्टांताची मात'. ते म्हणतात की, मी माझ्या सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवल्यामुळे, मला ख-या दृष्टांताची भाषा कळली व त्याद्वारे भवरोगावर मात करता आली. साधूंच्या संगतीचे मर्म नीट समजले व तसे वागल्याने, तप केल्याने मी या संसारबंधनातून सुटलो."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates