2 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७६ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगाच्या शेवटी, *"साधूंचे संगतीं तरणोपाय ॥"* असा फार महत्त्वाचा सिद्धांत मांडतात. परमार्थात या साधूसंगतीला अतिशय महत्त्व दिलेले आहे.
यावर भाष्य करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "या अभंगाचा सारांश म्हणजे, आपण सोबत आणलेली कर्मे भोगत असताना, त्याबद्दल कोणालाही दोष न देता, श्रीगुरूंनी दाखविलेल्या वाटेने निष्ठेने जावे. जो असे वागतो, त्यालाच साधूंच्या संगतीने होणारा तरणोपाय अनुभवास येतो. तरणोपाय म्हणजे तरून जाण्याचा उपाय.
श्रीगुरूंनी दाखविलेल्या मार्गाने निष्ठाप्रेमाने गेले की विवेकरूपी तीर्थाच्या तीरावर आपण सुखरूप पोचतो व तेथेच आपल्या बुद्धीने जन्मजन्मांतरी साठवलेला मळ धुतला जाऊन ती बुद्धी शुद्ध होते. अशा शुद्ध बुद्धीतच परमात्मा प्रकट होत असतो. पण त्यासाठी श्रीगुरूंनी दिलेले साधन भक्तीने, प्रेमाने करणे अगत्याचे आहे. कारण भाव प्रेमाशिवाय निर्माण होत नाही. प्रेमामुळे वृद्धिंगत झालेला भाव म्हणजेच भक्ती होय !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates