23 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ९७ ॥*

श्रीसंत एकनाथ महाराज साधूंचे श्रेष्ठत्व सांगतात की, देवांचा अवतार झाला तर दासांना सुख होते, पण दैत्यांना मात्र भय निर्माण होते. पण संतांचे तसे नसते. संतांच्या आगमनाने भक्तांना जसे सुख लाभते तसेच सुख दैत्यांनाही लाभते. दैत्य साधूंचा आदरसत्कारच करतात. हेच सद्गुरु श्री माउली देखील सांगतात की, "पाणी जसे तहान भागविण्यासाठी सर्व जीवांना हवेहवेसे असते, तसे हे साधू देखील अवघ्या त्रैलोक्याला हवेहवेसे वाटतात. त्यांच्या पावन संगतीची इच्छा सर्वजण नेहमीच करतात. पण त्याचवेळी हे साधू मात्र अंतर्बाह्य विषयांची आसक्ती सोडून, आपले चित्त कोठेही गुंतू न देता, एकाकी बनून आपले आपल्याशीच रममाण होऊन राहिलेले असतात. त्यांना आपल्या प्रसिद्धीशी, लोकांच्या हवेहवेसे वाटण्याशी काहीही घेणे-देणे नसते. ते सदैव आपल्याच आनंदात विचरण करीत असतात."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates