30 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १०४ ॥*

सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी केलेले, भगवान श्री माउलींच्या हरिपाठातील *"साधुबोध जाला तो नुरोनिया ठेला ।"* या सहाव्या अभंगाचे विवरण आपण पाहात आहोत. "साधू कोणाला म्हणावे?" याचे पू.मामा सखोल विवेचन करीत आहेत. साधुत्वाच्या कसोट्या ते मुद्दामच एवढ्या विस्ताराने सांगत आहेत; कारण अशा साधूंनी केलेला बोधच परमार्थात महत्त्वाचा मानलेला आहे.
श्रीभगवंतांना आपल्या या भक्तांचे, साधूंचे किती प्रेम असते, हे आपण पाहिले. त्या भक्तांच्या चरणमुद्रेला, वत्सलांच्छनालाही ते केवढ्या अभिमानाने आपल्या हृदयावर वागवतात. त्यांचे प्रेमच असे अपूर्व आणि मनोहर असते!
या वत्सलांच्छनाचे महत्त्व श्रीसंत एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतात फार छान सांगितले आहे. ते म्हणतात, देवांना हे लांच्छन इतके प्रिय आहे की, वैकुंठात देवांशी सरूपता मुक्ती लाभलेले भाग्यवान जीव व श्रीभगवंत यांच्यातला फरक ओळखण्याचे ते व्यवच्छेदक लक्षणच मानले जाते. देवांशी सरूपता झाली की त्या जीवाला  त्यांच्यासारखेच चतुर्भुज रूप लाभते, पण वत्सलांच्छन मात्र मिळत नाही. ते केवळ श्रीभगवंतांचेच दिव्य शरीरलक्षण आहे. आपल्या भक्तांवर देवांचे इतके अनन्यसाधारण प्रेम असते, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध होते; आणि अशाच अनन्यभक्तांनाच खरे साधू म्हटले जाते. याच साधूंना देव स्वत: वंदन करतात, त्यांची सेवा करायला मिळाल्याने सुखी होतात आणि त्यांचेच अद्भुत प्रेम सतत अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येत असतात.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates