5 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *५ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७९ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींना अभिप्रेत असलेल्या व  साधुसंगतीतून लाभणा-या तरणोपायासाठी आदर्श म्हणून पू.पार्वतीदेवी श्रीगुरुचरित्रातील दीपक शिष्याची कथा सांगत असत. त्याच विवेचनाच्या ओघात पू.पार्वतीदेवी याच्या पूर्णपणे उलटे उदाहरणही आवर्जून देत असत. काय अनुसरावे? हे नीट कळण्यासाठी, चुकूनही काय अनुसरू नये? हेही माहीत असायला नको का?दीपकाच्या रूपाने निष्ठावंत व अनन्य शिष्योत्तम पाहिला; आता स्वार्थी व निरुपयोगी शिष्यही पाहूया.
एक गुरु व शिष्य होते. त्या गुरूंनी लाडू, पेढे बर्फी वगैरे दिली की तो शिष्य म्हणायचा, "महाराज, आपली आज्ञा कशी मोडू?" अाणि ते पदार्थ प्रसाद म्हणून तत्परतेने खाऊन टाकायचा.
एकदा त्याच्या गुरूंनी विचार केला की, याची 'आज्ञे'ची व्याख्या तरी काय आहे ते पाहावे. म्हणून त्यांनी त्या शिष्याला एका गावी जाऊन काही काम करून येण्यास सांगितले. ते एकताच तो ओकसाबोकशी रडू लागला व म्हणाला, "महाराज! आपले चरण कसे सोडू?" हे ऐकून गुरूंनी त्याची स्वार्थी मनोवृत्ती पक्की ओळखली व हा निरुपयोगी आहे, याची खूणगाठही त्यांनी बांधली. असले शिष्यपण परमार्थासाठी अयोग्य आहे, हे आपण नीट समजून घ्यायला हवे व चुकूनही त्या वाटेला जाता कामा नये.
म्हणूनच, माउली म्हणतात की, *"साधूंच्या संगतीत स्वार्थाने राहून काहीच फायदा होत नाही. त्यांना अनन्य शरण जाऊन, त्यांची कृपा संपादन करून, ते सांगतील तसे तप करून जन्माचे सार्थक करून घेणे, हीच खरी भक्ती आहे !"*
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates