12 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *१२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८६ ॥*

सद्गुरु श्री माउलींनी सांगितलेली साधूंची चार लक्षणे आपण पाहिली. पुढचे लक्षण सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, साधूंचा स्वभाव अतिशय करारी असतो. ते जो एकदा ठरवतात, तो निश्चय  प्राणपणाने सांभाळतात. आपल्या भूमिकेपासून ते कधीच ढळत नाहीत किंवा रोज उठून नवीन भूमिका घेत नाहीत. याचे कारणही श्री माउली सांगतात की, हे साधू आपले मन आपल्याच ताब्यात ठेवून असतात. ते मनाच्या आहारी गेलेले नसल्याने त्या मनाच्या एरवीच्या चांचल्याचा त्यांच्यावर परिणामच होत नाही. त्यांचे मनही श्रीचरणीं एकरूप झालेले असल्याने ते देखील स्थिरच झालेले असते. म्हणूनच त्यांच्या हृदयरूपी मंदिरातील एकाच सिंहासनावर जीव व परमात्मा दोघेही विराजमान झालेले असतात.
हे जीवब्रह्मैक्य त्या साधूंचे अपूर्व असे योगैश्वर्यच आहे. एवढेच नाही तर, सोन्याला सुगंध यावा तसे हे महात्मे आत-बाहेर संपूर्ण योगयुक्त होऊन, श्रीचरणीं मन-बुद्धी अर्पूनही पुन्हा श्रीभगवंतांवर नि:सीम प्रेम देखील करीत असतात. यासाठीच सद्गुरु श्री माउली सांगतात की, अशा साधूंनाच केवळ भक्त, मुक्त आणि योगी म्हणावे. असे हे योगसमृद्ध महात्मे आनंदकंद श्रीभगवंतांचेही परमप्रिय न झाले तरच नवल !
सद्गुरु श्री माउलींनी येथे साधूंचे निश्चय, चित्तस्थैर्य व जीवब्रह्मैक्यरूपी योगैश्वर्य हे गुणवर्य कथन केलेले आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates