14 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *१४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८८ ॥*

आपल्या अनन्यभक्तांची स्तुती करून श्रीभगवंतांना अतीव आनंद झालेला होता. त्या आनंदाच्या भरात प्रसन्नपणे डोलणारे भगवंत आपल्या सख्याला पुन्हा म्हणाले, "अर्जुना, मी ज्यांना प्रेमाने माझ्या अंत:करणात सदैव वागवतो, अशा भक्तांची लक्षणे तुला सांगतो, ऐक!"
श्रीभगवंतांचे हृद्गत सुरेख शब्दांत व्यक्त करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, समुद्र खवळला की किती भयानक दिसतो? आपण ते पाहून घाबरतो, पण त्या समुद्रात सतत राहणा-या माशांना त्याचे भय वाटत नाही आणि माशांची कितीही उत्पत्ती झाली तरी समुद्राला त्यांचा कंटाळा येत नाही. तसे, हे जग कितीही उद्धटपणे वागले तरी त्याबद्दल भक्तांना कधीच काहीही वाटत नाही व त्यामुळे त्यांच्याकडून कोणालाही कधीच कसलाही त्रास देखील पोहोचत नाही.
अापल्याच शरीराच्या अवयवांचा आपल्याला कधी त्रास वाटतो का? त्याप्रमाणे सर्व जीवांचे जीव आपणच आहोत, ही भावना भक्तांची पक्की असल्यामुळे ते कोणाचाही कंटाळा मानीत नाहीत. सर्व जग हे आपलाच देह मानून, ते भक्त प्रिय-अप्रिय किंवा हर्ष-विषाद या द्वैतभावनेपासून वेगळेच असतात. असे द्वंद्वरहित महात्मे मला अत्यंत प्रिय असतात, माझ्या जीवाचे जीवच असतात!"
आज ज्यांचा वैकुंठगमन दिवस आहे, ते सद्गुरु श्री तुकाराम महाराज हेही श्रीभगवंतांचे असेच अनन्य भक्तराज होत!
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates