24 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ९८ ॥*

हरिरंगी रंगलेल्या साधूंचे गुणवर्णन करणे हे श्रीभगवंतांचे लाडके काम आहे. साधूंची जगावेगळी स्थिती सांगताना ते म्हणतात, "आकाशावर जसा कसलाच रंग चढत नाही, त्याप्रमाणे कोणी निंदो किंवा कोणी वंदो, साधूंना त्याने काहीच फरक पडत नाही. ते त्या बाबतीत पूर्ण उदासीन असतात.
साधू सदैव उन्मनी अवस्थाच भोगीत असल्याने आपोआपच मौनी झालेले असतात. खरे अथवा खोटे, काहीच ते बोलत नाहीत. पाऊस पडला काय अन् न पडला काय, समुद्राला ते सारखेच असते. तसे साधूंना काही मिळेल त्यात संतोष असतो व काही मिळाले नाही तरी त्याचा विषाद नसतो.
वायू जसा सर्वकाळ सर्वत्र वाहात असतो, त्याला एक असे घर नाही. तसे हे साधूही कोणाचाच आश्रय करत नाहीत. त्यांनी एकमात्र तो परमात्माच धरून ठेवलेला असतो. त्यामुळे त्या परमात्म्यासारखेच हे साधूही विश्वरूपच झालेले असतात. सगळे विश्व हेच त्यांचे घर बनलेले असते आणि अशा विलक्षण संतांवर माझे निरतिशय प्रेम असते !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates