9 March 2017

*॥ अमृतबोध ॥* *९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८३ ॥*

हरिपाठाच्या पाचव्या अभंगातून सद्गुरु श्री माउलींनी, "कशामुळे प्राण्यांचा उद्धार होईल?" या प्रश्नाचे उत्तर "साधूंच्या संगतीमुळे" असे दिलेले आहेच. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यावर मार्मिक भाष्य  करताना म्हणतात, "भाग्याने साधूंची संगत झाली, ठीक आहे; पण पुढे काय? हा प्रश्न उरतोच. याच प्रश्नाचे सुंदर उत्तर भगवान श्री माउली हरिपाठाच्या सहाव्या अभंगात देतात. माउली सांगतात की, *साधूंच्या संगतीत त्यांच्याकडून जो बोध होतो, त्याचे सतत अनुसंधान करून आलेल्या अनुभूतीनेच साधकाचा उद्धार होत असतो. नुसती संगत मिळून भागत नाही."*
प.पू.मामा येथे साधू या संज्ञेचा सविस्तर परामर्श घेतात. कारण, आज खरे साधूच दुर्मिळ झालेले आहेत. शिवाय साधूंना ओळखणे सामान्य माणसाला तसे सोपे नाही. म्हणून उद्यापासून आपणही पू.मामांनी सांगितलेल्या साधू-लक्षणांचा ऊहापोह करूया !
(आज फाल्गुन शुद्ध द्वादशी व गुरुपुष्यामृत योग, आजच्याच तिथीला गुरुपुष्ययोगावर १९९० साली प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी, पूर्वी झालेल्या दृष्टांतानुसार महाराष्ट्रातील दक्षिण गिरनार समजले जाणा-या *श्रीक्षेत्र दत्तधाम* येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. आजच्या इमेजमधून याच पावन स्थानाचे व मंदिराचे दर्शन होत आहे !)
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates