Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३५ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगाच्या तिस-या चरणात वाचाळांबद्दल सांगतात की, *"अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैचेनि गोपाळ पावे हरि ॥७.३॥"* याचे विवरण करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, पुष्कळ मंडळी निरनिराळे ग्रंथ वाचून, किंबहुना पाठ करून त्यांची प्रमाणे देऊन आपण ज्ञानी असल्याचे...
Read More

29 April 2017

॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३४ ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमार्थाचा सुयोग्य अधिकारी कसा असतो, हे सांगताना म्हणतात, "ज्याच्या तपाचा पाया भक्कम असेल, त्या पायावर गुरुभक्तीरूपी सुंदर मंदिर उभारलेले असेल, त्या मंदिराचे श्रवणेच्छारूपी दरवाजे सदैव उघडे असून अनिंदकपणाचा कळस त्या मंदिरावर चढविलेला असेल, अशा भक्ताला परमार्थाचा उत्तम...
Read More

28 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३३॥*

सद्गुरु श्री माउली अभक्तांचे महत्त्वाचे लक्षण सांगतात की, एखादा तपस्वी, गुरुभक्त असेल व त्याला श्रवणेच्छाही असेल, पण तो जर श्रीभगवंतांना सामान्य मनुष्य मानत असेल, त्यांच्या सर्वसमर्थ विभूतिमत्वाची त्याला खात्री नसेल व तो भगवंतांची तसेच त्यांच्या भक्तांची निंदा करीत असेल; तर तो अभक्तांचा शिरोमणीच मानला...
Read More

27 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३२ ॥*

सद्गुरु श्री माउली सांगतात की, तपस्वी असून जो गुरुभक्त नसेल तर तो अधिकारी नाही. तपस्वी आहे, गुरुभक्तही आहे, पण त्याला शास्त्रश्रवणाची इच्छाच नसेल तरीही तो योग्य नाही. जसे मोती कितीही चांगला असला तरी त्याला जर वेज पाडलेले नसेल तर त्याचा उपयोग काय? त्यात दोरा शिरणारच नाही. समुद्र अगाध आहे मान्य; पण त्यावर...
Read More

26 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३१ ॥*

श्रीमद् भगवद् गीताशास्त्रसेवनाचा योग्य संप्रदाय सांगताना श्री माउलींनी काही लक्षणे सांगितलेली आहेत. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्या लक्षणांना अभक्तांचीच लक्षणे मानतात व त्याचे सुरेख स्पष्टीकरणही करतात. जो तप करीत नाही, तो येथे अनधिकारी आहे. एकवेळ तप करतो पण त्याच्या अंत:करणात गुरुभक्तीच नसेल...
Read More

25 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३० ॥*

सद्गुरु श्री माउलींचे हृद्गत सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, "जो कर्म, उपासना व ज्ञान या तिन्हींचा प्रेमाने अंगीकार करून जगतो, तोच खरा भक्त होय. आणि अशी भक्ती ज्यांना नाही, ते पतित असून शिवाय अभक्त ह्या कोटीत गणले जातात. कारण ते श्रीहरींना भजत नाहीत." कर्म, उपासना व ज्ञान या...
Read More

24 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२९ ॥*

एखादा माणूस उपासना करतोय, पण भगवान श्रीहरींची न करता इतर देवतांची जर करत असेल, तरी त्यालाही खरी प्राप्ती होत नाही. सद्गुरु माउली अशा माणसालाही दैवहतच म्हणतात. या अन्यदेवता उपासकांचे भगवान नारायणांच्या सगुणरूपावर खरे प्रेम नसते. शिवाय भक्तिहीन काम्य उपासना असल्यामुळे त्यांच्या उपासनेत फार अडचणी येतात....
Read More

23 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२८ ॥*

आसुरी संपत्तीच्या दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य (कठीणपणा) व अज्ञान या सहा दोषांची लक्षणे सद्गुरु श्री माउलींनी सविस्तर सांगितलेली आहेत. त्यांची दाहकता सांगताना पुढे ते म्हणतात, "प्रलयकाळचा अग्नी, समुद्रातला वडवाग्नी व विद्युतअग्नी हे दिसायला अवघे तीनच असले, तरी एका पंक्तीला जेवायला बसले तर त्यांना...
Read More

22 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२७ ॥*

आसुरी दुर्गुणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दुर्गुण म्हणजे 'अज्ञान'. या अज्ञानाचे लक्षण सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "पाषाणाला ज्याप्रमाणे शीत-उष्ण स्पर्शाचे ज्ञान नसते, जन्मांध व्यक्तीला रात्र व दिवसातला फरक समजत नाही, स्वयंपाकातल्या पळीला निरनिराळ्या रसांची चव कळत नाही; तसे कर्तव्य व अकर्तव्याविषयी...
Read More

21 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२६ ॥*

दैवहत व अभक्त मनुष्य आसुरी गुणांची खाणच असतो. त्या गुणांमध्ये 'क्रोध' हा चौथा दुर्गुण आहे.( कालच्या अमृतबोधात चुकून 'अभिमान' हा चौथा दुर्गुण आहे असे लिहिले गेले होते. अभिमान हा तिसरा दुर्गुण आहे.) या क्रोधाची लक्षणे सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "दुस-याला सुख झालेले पाहिल्याबरोबर ज्याच्या मनोवृत्तीत...
Read More

20 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२५ ॥*

आसुरी संपत्तीतील चौथा दोष आहे 'अभिमान'. ईश्वराची वाणी असणारे वेदवचन सर्व जगाला मान्य आहे, त्यातून ज्याचे प्रतिपादन केले जाते तो परमेश्वर सर्वांना पूज्य आहे. या सर्वसंमत सिद्धांतांचा नुसता उच्चार जरी कोणी केला तरी ज्याला ते सहन होत नाही; व त्या दयाळू ईश्वराविषयी मत्सर वाटून त्या 'ईश्वरालाही मी खाऊन...
Read More

19 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२४ ॥*

आसुरी संपत्तीतील दुसरा दोष म्हणजे 'दर्प'. दर्प याचा अर्थ खोट्या अहंकारातून निर्माण झालेला माज. या दर्पाचे लक्षण सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, मूर्ख माणसाच्या जिभेवर विद्येचा थोडासा शिंतोडा जरी पडला तरी तो लगेच फुगून जाऊन विद्वानांच्या सभेलाही तुच्छ मानू लागतो. काटेरी कुंपणाच्या टोकावर बसलेला...
Read More

18 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२३॥*

सद्गुरु श्री माउलींची एक सुंदर ओवी प्रमाणाला घेऊन प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, ज्या बुद्धीला परमात्माच शेवट आहे, म्हणजे जी बुद्धी परमात्म्यापर्यंत पोहोचते, तीच खरी बुद्धी होय. बाकीच्या सर्व दुर्मती होत अाणि दैवहत अभक्तांच्या ठिकाणी ह्याच सर्व दुर्मती ठासून भरलेल्या असतात. सद्गुरु...
Read More

17 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२२ ॥*

देवर्षी नारद सांगतात की, भक्ती ही मुळात प्रेमस्वरूप आहे व ते प्रेमही अमृतस्वरूप व्हावे लागते. यावर प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे फार सुंदर दृष्टांत देत असत. आई, बहीण, बायको, लेक आणि ठेवलेली बाई; या सर्वच स्त्रिया आहेत. परंतु यांपैकी फक्त आईवरची प्रेमयुक्त भक्ती मुक्तीला कारण होईल. बाकी बहीण,...
Read More

16 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२१ ॥*

सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगात पातकी माणसाविषयी सांगताना म्हणतात, *"पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥"* प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचा अर्थ सांगतात, "पर्वताप्रमाणे पातक करणे म्हणजे पातकांशिवाय अन्य काहीच न करणे. अशी ज्याची वृत्ती असते, त्याच्यावर ती पातके...
Read More

15 April 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२०॥*

हरिपाठाच्या सातव्या अभंगात सुरुवातीला सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज दुर्दैवी अभक्तांची स्थिती सांगतात. आधीच्या सहाव्या अभंगात जे मर्म सांगितले, ते कोणास प्राप्त होते? तेही माउली या अभंगात आपल्याला सांगत अाहेत. "सर्वांच्या हृदयात गुप्तपणे नांदत असलेला आत्मारामप्रभू माझ्या पूर्ण अनुभवाला आल्यामुळे,...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates