Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३१ ऑगस्ट २०१६

३१ ऑगस्ट २०१६ जो आपली साधना हेच कर्तव्य मानून मनापासून करतो तो साधक. साधनेच्या सातत्यामुळेच तर त्याला साधक म्हणतात. साधनामार्गातील मार्मिक रहस्य सांगून हमखास यशाचा मोलाचा बोध करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जो श्रीसद्गुरूंनी दिलेल्या साधनेशी अनन्य होतो, त्यालाच परमार्थातील...
Read More

30 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३० ऑगस्ट २०१६

३० ऑगस्ट २०१६ सर्वसामान्य माणूस आपल्याच कर्माने जरी दु:ख आले तरी रडत बसतो आणि भगवंतांची आठवण काढून त्या परिस्थितीसाठी त्यांनाच दोष देतो. उलट सुख झाले की ज्यांच्या कृपेने ते सुख लाभले त्या श्रीभगवंतांना सोयिस्करपणे विसरतो व स्वत:च्या अहंकारालाच कुरवाळत बसतो. ही जगराहाटी जाणून प. पू. श्री. मामासाहेब...
Read More

29 August 2016

॥ अमृतबोध ॥२९ ऑगस्ट २०१६

२९ ऑगस्ट २०१६ घाई गडबड, धसमुसळेपणा हा प्रपंचाचा गुण तर शांतपणा, स्थैर्य हा परमार्थाचा गुण आहे. शारीरिक व मानसिक या दोन्ही प्रकारचे स्थैर्य परमार्थासाठी अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आवर्जून सांगतात की, कोणतेही शुभकार्य उत्तम पद्धतीने संपन्न होण्यासाठी त्यात आपल्या...
Read More

28 August 2016

॥ अमृतबोध ॥ २८ ऑगस्ट २०१६

२८ ऑगस्ट २०१६ श्रीभगवंतांच्या कृपेने संतांची(सद्गुरूंची) प्राप्ती आणि मग त्यांच्या कृपेने भगवंतांची प्राप्ती; असाच भक्तिशास्त्रातला क्रम आहे. खरे संत दुर्मिळ असले तरी प्राप्त होणे अशक्य नक्कीच नाही. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जसा तेजस्वी हिरा दुर्मिळ असला तरी मिळू...
Read More

27 August 2016

॥ अमृतबोध ॥ २७ ऑगस्ट २०१६

२७ ऑगस्ट २०१६ साधुसंत हे निरपेक्ष हितकारक असतात, त्यामुळे आपणही निरपेक्षपणेच त्यांना शरण जायचे असते. त्यांच्याविषयी नितांत श्रद्धा व आदरयुक्त विश्वास असला की, आपल्यावर त्यांना कृपा करण्यासाठी तेवढे पुरेसे असते. पण तेच जर अश्रद्धा व अविश्वास ठेवूनच आपण त्यांच्या दारी गेलो, तर त्या दोषांमुळे संतांचा...
Read More

26 August 2016

॥ अमृतबोध ॥ २६ ऑगस्ट २०१६

२६ ऑगस्ट २०१६ प्रार्थना हा भक्त हृदयाचा सहज आविष्कार आहे. प्रार्थनेत कामनेचा गढूळपणा नसतो की याचनेची अगतिकता नसते. तो तर प्रेमळ व स्वाभाविक अनुकार आहे भक्तीचा ! म्हणूनच श्रीभगवंतांना मनापासून केलेली प्रार्थना, कशीही असली तरी आवडतेच. " नये जरी तुज मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे । नाही तयेवीण...
Read More

25 August 2016

॥ अमृतबोध ॥ २५ ऑगस्ट २०१६

२५ ऑगस्ट २०१६ ॥ श्रीजन्माष्टमी ॥ श्रीभगवंतांचा आणि साधूसंतांचा अवतार हा जगाच्या शाश्वत कल्याणासाठीच असला तरी त्यांच्या कार्यात किंचित फरक असतो. तो फरक नेमकेपणे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. श्रीभगवंत जन्मल्याबरोबर आपल्या लोकोद्धाराच्या कार्याला सुरुवात करतात, म्हणून श्रीभगवंतांची...
Read More

24 August 2016

॥ अमृतबोध ॥ २४ ऑगस्ट २०१६

२४ ऑगस्ट २०१६ श्रीगुरुचरित्रात सरस्वती गंगाधर वारंवार " आपुली जोडी भोगावी । " असे म्हणतात. आपणच जोडलेले बरे-वाईट कर्म आपण भोगत असतो, त्यात कोणाही इतरांचा काहीही संबंध नाही. या अर्थाने आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे हाच महत्त्वाचा सिद्धांत येथे पुन्हा अधोरेखित...
Read More

23 August 2016

॥ अमृतबोध ॥ २३ ऑगस्ट २०१६

२३ ऑगस्ट २०१६ आज तारखेने श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांची ७४१ वी जयंती ! प्रपंच मूळचाचि नासका । असे समर्थ श्रीरामदास स्वामी स्पष्ट म्हणतात. पण तो कितीही त्रासदायक असला तरी आम्ही मात्र रोज रोज तेच ते करून त्याची सवय लावून घेतल्याने, तो आम्हांला गोडच लागतो. माउली म्हणतात की, सर्पविषाच्या बाधेने जसा...
Read More

22 August 2016

॥ अमृतबोध ॥ २२ ऑगस्ट २०१६

२२ ऑगस्ट २०१६ प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये)  स्वामी महाराज जयंती ! देव ते संत देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा ॥ असे श्रीतुकाराम महाराज म्हणतात. श्रीभगवंत आणि त्यांचेच अभिन्न स्वरूप असणारे साधुसंत; दोघेही जगाच्या कल्याणासाठीच सतत झटत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज...
Read More

21 August 2016

॥ अमृतबोध ॥ २१ ऑगस्ट २०१६

२१ ऑगस्ट २०१६ वृद्धत्व हा खरेतर शापच आहे. पण तो कोणीही टाळू शकत नाही. म्हणून संत सांगतात की, वृद्धपण येण्यापूर्वीच, जे जे योग्य ते ते सर्वकाही तरुणपणीच साधून घ्यावे. वृद्धपणीचा एक महत्त्वाचा भाग सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ज्याचा आधार जन्मभर मानलेला असतो, ते शरीर...
Read More

20 August 2016

॥ अमृतबोध ॥ २० ऑगस्ट २०१६

२० ऑगस्ट २०१६ आपल्या बुद्धीचे कार्य हे फार विलक्षण असते. ती योग्य-अयोग्य निर्णय करून आपल्याला हिताचेच वागायला प्रवृृत्त करीत असते. तिच्या या सामर्थ्यालाच ' विवेक ' म्हणतात. हा विवेक ज्याचा सखा होतो, तोच सर्व बाजूंनी समाधानी होत असतो. पण हा विवेक योग्यवेळी सुचणे हे मात्र संतांच्या, सद्गुरूंच्या...
Read More

19 August 2016

॥ अमृतबोध ॥ १९ ऑगस्ट २०१६

१९ ऑगस्ट २०१६ श्रीज्ञानेश्वर माउली संशयाला घोर महापाप म्हणतात. हा संशय प्रपंच आणि परमार्थात सर्व बाजूंनी आपले वाटोळेच करीत असतो. म्हणूनच श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला उपदेश करतात की, गुरु, देव, धर्म व ज्यांनी आपल्यावर काही उपकार केलेले आहेत, यांच्या विषयी थोडाही संशय बाळगला तर त्यातून...
Read More

18 August 2016

॥ अमृतबोध ॥ १८ ऑगस्ट २०१६

१८ ऑगस्ट २०१६ जगाच्या सुखासाठी संत निरपेक्षपणे झटत असतात. त्यांना श्रीभगवंतांच्या कृपेने मागचे-पुढचे सर्व काही स्पष्ट दिसत असल्याने, शरण येतील त्या सर्वांना ते सुयोग्य मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच आपल्या सर्वांगीण हिताचा विचार करून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज, संतांची खरी आराधना कोणती?...
Read More

17 August 2016

॥ अमृतबोध ॥ १७ ऑगस्ट २०१६

१७ ऑगस्ट २०१६ आपली बुद्धी आपल्या दैवानुसारच तयार होत असते. त्यामुळे जे कर्म भोगाला येते त्याला अनुकूल अशीच आपोआप बुद्धी होत असते. येथे प्रत्येक जीव परतंत्र आहे, त्याला निर्णयक्षमता नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एकदा का प्रारब्धानुसार दुर्दशेचा फेरा भोगाला आला की,...
Read More

16 August 2016

॥ अमृतबोध ॥ १६ ऑगस्ट २०१६

१६ ऑगस्ट २०१६ शारीरिक व मानसिक असे दोन प्रकारचे दु:ख असते. शारीरिक दु:ख योग्य औषधोपचाराने व पथ्याने जाते. पण मानसिक दु:ख हे अधिक व्यापक असल्याने व आपण त्याला फार कवटाळून बसत असल्याने तेवढे सहजपणे जात नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, त्यासाठी संतांची संगतीच व्हावी...
Read More

15 August 2016

॥ अमृतबोध ॥ १५ ऑगस्ट २०१६

१५ ऑगस्ट २०१६ आपले हे जग सुख-दु:खांची खाणच आहे. सुखानंतर दु:ख रहाटगाडग्याप्रमाणे चालूच असते. पण आपण त्यात जास्त गुंतून पडतो, सतत त्याचाच विचार करतो म्हणून आपल्याला जास्त त्रास होतो. आपल्याला सुखाचा माज असतो जो सुखानंतर येणारे दु:ख अधिक वेदनादायक करतो आणि दु:खात आपण इतके मग्न झालेलो असतो की पुढे...
Read More

14 August 2016

॥ अमृतबोध ॥ १४ ऑगस्ट २०१६

१४ ऑगस्ट २०१६ " दुस-याचे कुसळ दिसते पण आपले मुसळ दिसत नाही ", अशी आपल्याकडे म्हण आहे. ती अत्यंत खरी आहे. हाच आपला स्वभाव सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपण इतरांचे दोष काढण्यात पटाईत असतो, पण तेच दोष आपल्याही ठिकाणी आहेत, याकडे आपण सोयिस्कररित्या दुर्लक्ष करतो. आणि जर...
Read More

13 August 2016

॥ अमृतबोध ॥ १३ ऑगस्ट २०१६

१३ ऑगस्ट २०१६ भगवान श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " येती निंदकापाशी । अशेष पापे ॥ " आपण नेहमीच्या स्वभावाने, सवयीने किंवा परिस्थितीची गरज म्हणून का होईना पण एखाद्याची निंदा केली की, आपले पुण्य त्याला जाते व त्याचे पाप आपल्याला लागते. म्हणून याबाबतीत साधकांनी खूप जपायला हवे स्वत:ला. जो तो आपापल्या...
Read More

12 August 2016

॥ अमृतबोध ॥ १२ ऑगस्ट २०१६

१२ ऑगस्ट २०१६ सध्याचे जग हे जाहिरातीचे जग आहे. येथे कसलीही जाहिरात खपते, भले मग ती गोष्ट खोटी का असेना ! पण अध्यात्म किंवा भक्ती हे अंतरंग साधनेचे विषय आहेत. त्यात दिखावूपणा चालत नाही. सध्या कणभराची भक्ती मणभराच्या जाहिरातीसोबतच करण्याची पद्धत रूढ होत आहे. यावर नापसंती व्यक्त करीत साधकांना मोलाचा...
Read More

11 August 2016

॥ अमृतबोध ॥ ११ ऑगस्ट २०१६

११ ऑगस्ट २०१६ सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या मिश्रणाने आपले अंत:करण बनलेले असते. त्यातला सत्त्वगुण  हा श्रेष्ठ मानला जातो. आपल्या कर्मांमुळे सामान्यपणे तो दुर्मिळ असतो व कमी काळ टिकतो. सत्त्वगुण वाढावा म्हणून सर्व संत मार्गदर्शन करीत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणूनच म्हणतात...
Read More

10 August 2016

॥ अमृतबोध ॥ १० ऑगस्ट २०१६

१० ऑगस्ट २०१६ आपल्याला श्रीभगवंतांची प्राप्ती व्हावी, असे ज्याला मनापासून वाटते व जो त्यासाठी निर्धाराने प्रयत्नशील अाहे, अशा साधकाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज, साधनेत प्रचंड यश देणारी पंचसूत्री येथे सांगत अाहेत. प्रत्येक साधकाने या बोधाचे अक्षरश: दररोज...
Read More

9 August 2016

॥ अमृतबोध ॥ ९ ऑगस्ट २०१६

९ ऑगस्ट २०१६ या जगात सुख-दु:खांचा अनुभव सर्वांना सतत येतच असतो. सुखाने आनंद तर दु:खाने विषाद निर्माण होतो. सामान्यपणे आपण सुखाने वाहावत जातो तर दु:खाने खचून जातो. या दोन्ही गोष्टी तोट्याच्याच आहेत. पण कोणीही या टाळू शकत नाही. संतच फक्त यांच्या पलीकडे गेलेेले असल्याने, सुख-दु:खांच्या विषयी आपल्याला...
Read More

8 August 2016

॥ अमृतबोध ॥ ८ ऑगस्ट २०१६

८ ऑगस्ट २०१६ आपण कोणासाठी काय करतो? तर ज्याच्यावर आपले प्रेम आहे, त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. परमार्थात हीच भावना श्रीभगवंतांसाठी असावी लागते. " आपल्याला परमआराध्य श्रीभगवंतांसाठी काहीतरी करायचे आहे ", ही शुद्ध परमार्थाचे लक्षण असणारी अात्यंतिक निष्ठा केवळ श्रीसद्गुरुंनी कृपा केल्यावरच...
Read More

7 August 2016

॥ अमृतबोध ॥७ ऑगस्ट २०१६

७ ऑगस्ट २०१६ प्रत्येक जीव मूळचा परब्रह्माचाच अंश आहे. म्हणजे तो ज्ञानमय, आनंदमयच आहे, पण त्यावरील वासनांच्या आवरणामुळे त्याला आपले आनंदस्वरूप जाणवतच नाही. तो उगीचच स्वत:ला कर्माचा कर्ता मानून सुखदु:खांच्या सागरात गटांगळ्या खात बसतो. श्रीभगवंत जेव्हा त्याला श्रीसद्गुरुरूपाने अनुग्रह करून दिव्यनाम...
Read More

6 August 2016

॥ अमृतबोध ॥ ६ ऑगस्ट २०१६

६ ऑगस्ट २०१६ ज्यांना आपले शाश्वत कल्याण व्हावे असे मनापासून वाटते, त्या साधकांनी काय करावे, काय करू नये; याचे सुंदर मार्गदर्शन अनुभवी संतांनी वेळोवेळी करून ठेवलेले आहे. असाच एक प्रेमाचा सल्ला देताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, आपला शक्य तेवढा वेळ मानसिक नामस्मरणातच घालवावा....
Read More

5 August 2016

॥ अमृतबोध ॥ ५ ऑगस्ट २०१६

५ ऑगस्ट २०१६ परमार्थ हा पूर्णपणे श्रीगुरुकृपेचा विलास असतो. परमार्थाची सुरुवातच श्रीगुरुंच्या कृपेने होते. तोवर चालू असलेली आपली उपासना चूक नसली तरी ती अंधारात चाचपडण्यासारखीच असते. जेव्हा आपल्या उपासनेने श्रीभगवंतांना दया येते तेव्हा मग ते श्रीगुरुरूपाने आपल्यावर कृपा करून आपल्याला नाम देतात....
Read More

4 August 2016

॥ अमृतबोध ॥ ४ ऑगस्ट २०१६

४ ऑगस्ट २०१६ नामस्मरण ही विशेष प्रक्रिया आहे. याविषयी संतांनी फार छान मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामस्मरणाची प्रधान अंगे सांगताना म्हणतात की, नाम हे त्याच्या -हस्वदीर्घ उच्चारांनुसारच म्हटले गेले पाहिजे. शिवाय ते नाम परंपरेने आलेल्या श्रीगुरुंच्या मुखातून...
Read More

3 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३ ऑगस्ट २०१६

३ ऑगस्ट २०१६ श्रीभगवंतांच्या दोन विग्रहांचे संत वर्णन करतात. एक त्यांची स्थूल मूर्ती व दुसरी त्यांच्या नामातून तयार होणारी " अक्षरमूर्ती " होय. या दोन्हींमधला मार्मिक भेद सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की,  मंदिरातील मूर्ती आपण थोडा वेळ पाहतो, पण नामातून तयार होणा-या...
Read More

2 August 2016

॥ अमृतबोध ॥ २ ऑगस्ट २०१६

२ ऑगस्ट २०१६ श्रीभगवंतांचे नाम हे अत्यंत अद्भुत असते. ते कसेही घेतले तरी फायदाच होतो. अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे ॥ हे आपण कायम ऐकत आलो आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामाचे श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात की, साधकाने एकाग्रचित्ताने जप केला तर लाभ होतोच, पण व्यग्र चित्ताने...
Read More

1 August 2016

॥ अमृतबोध ॥ १ ऑगस्ट २०१६

१ ऑगस्ट २०१६ श्रीभगवंतांचे नाम हे त्यांच्यासारखेच अलौकिक सामर्थ्यसंपन्न असते. त्याच्या सतत केलेल्या जपाने जिव्हेबरोबर मनही शुद्ध होत जाते. मन सुधारले की जीवनही सुधारते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज नामाच्या परीणामकारतेचे माहात्म्य सांगताना म्हणतात की, एखाद्याने साधी शिवी दिली तरी समोरच्याच्या...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates