15 August 2016

॥ अमृतबोध ॥ १५ ऑगस्ट २०१६


१५ ऑगस्ट २०१६
आपले हे जग सुख-दु:खांची खाणच आहे. सुखानंतर दु:ख रहाटगाडग्याप्रमाणे चालूच असते. पण आपण त्यात जास्त गुंतून पडतो, सतत त्याचाच विचार करतो म्हणून आपल्याला जास्त त्रास होतो. आपल्याला सुखाचा माज असतो जो सुखानंतर येणारे दु:ख अधिक वेदनादायक करतो आणि दु:खात आपण इतके मग्न झालेलो असतो की पुढे आलेले सुख आपण उपभोगेपर्यंत संपून जाते. वर्तमानात जगणेच आपण विसरलेलो आहोत. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दु:खाची तीव्रता कशी कमी करावी हे सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, दु:ख देणा-या गोष्टीचे सारखे सारखे चिंतन न करणे, ती गोष्ट तत्काळ तिथेच सोडून देऊन पुढे जाणे, हेच ते दु:ख कमी करण्याचे रामबाण औषध आहे आणि हाच विचार विवेकाने अंगी बाणवला तरच शाश्वत समाधान लाभेल.
७०व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !  हे स्वातंत्र्य मिळवून देणा-या सर्व सेनानींना, हुतात्म्यांना सादर अभिवादन !! स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, ती आमची मोठी जबाबदारी आहे ; याचे भान आम्हांला सतत असावे, हीच थोर स्वातंत्र्यसेनानी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक कळकळीची प्रार्थना !!!!
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates