30 August 2016

॥ अमृतबोध ॥ ३० ऑगस्ट २०१६

३० ऑगस्ट २०१६
सर्वसामान्य माणूस आपल्याच कर्माने जरी दु:ख आले तरी रडत बसतो आणि भगवंतांची आठवण काढून त्या परिस्थितीसाठी त्यांनाच दोष देतो. उलट सुख झाले की ज्यांच्या कृपेने ते सुख लाभले त्या श्रीभगवंतांना सोयिस्करपणे विसरतो व स्वत:च्या अहंकारालाच कुरवाळत बसतो. ही जगराहाटी जाणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज ख-या साधकाची अप्रतिम व्याख्या करताना म्हणतात की, जो दु:ख आल्यावर त्यात भगवंतांचे स्मरण हमखास होणार म्हणून त्या दु:खाला श्रीभगवंतांची कृपाच मानतो आणि सुखाची स्थिती आल्यावरही त्याच प्रेमाने श्रीभगवंतांचे स्मरण, चिंतन करायला जो चुकत नाही; तोच खरा साधक होय. हा आदर्श बोध आपण सर्वांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवूनच वागायला हवे, म्हणजे ते उत्तम साधकत्व आपल्याही अंगी बाणेल.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates