8 August 2016

॥ अमृतबोध ॥ ८ ऑगस्ट २०१६

८ ऑगस्ट २०१६
आपण कोणासाठी काय करतो? तर ज्याच्यावर आपले प्रेम आहे, त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. परमार्थात हीच भावना श्रीभगवंतांसाठी असावी लागते. " आपल्याला परमआराध्य श्रीभगवंतांसाठी काहीतरी करायचे आहे ", ही शुद्ध परमार्थाचे लक्षण असणारी अात्यंतिक निष्ठा केवळ श्रीसद्गुरुंनी कृपा केल्यावरच ख-या अर्थाने प्रकट होत असते, असे स्वानुभूत मत प.  पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे मांडत आहेत. आपली ही निष्ठा पक्की झाली की श्रीभगवंतही त्याच प्रेमाने आपल्याशी वागतात.
याच अर्थाने श्रीसंत कबीर महाराज आपल्या एका पदात फार सुरेख म्हणतात की, " श्रीसद्गुरुंनी आपल्याला ' आपले ' म्हटल्याशिवाय श्रीभगवंत स्वप्नात देखील येत नाहीत !"
बिन सतगुरु आपणो नही होई ।
प्रीतम सपणां नही आवै ॥
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates