11 August 2016

॥ अमृतबोध ॥ ११ ऑगस्ट २०१६


११ ऑगस्ट २०१६
सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या मिश्रणाने आपले अंत:करण बनलेले असते. त्यातला सत्त्वगुण  हा श्रेष्ठ मानला जातो. आपल्या कर्मांमुळे सामान्यपणे तो दुर्मिळ असतो व कमी काळ टिकतो. सत्त्वगुण वाढावा म्हणून सर्व संत मार्गदर्शन करीत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणूनच म्हणतात की, निरपेक्ष व चांगल्या कर्मांनी सत्त्वगुण वाढतो, म्हणून नेहमी चांगलेच वागावे. तशीच बुद्धी व्हावी यासाठी चांगला व शुद्ध आहार आणि विचार देखील सांभाळावा. चांगल्या लोकांची संगत व भोवतालचे चांगले वातावरणही सत्त्वगुणात वाढ करते. सत्त्वगुणामुळे समाधान बाणते व परमार्थही सोपा होतो. हे सर्व योग्यप्रकारे घडण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात श्रीभगवंतांचे स्मरण मात्र सतत ठेवायचा मनापासून प्रयत्न करायला हवा.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates