13 August 2016

॥ अमृतबोध ॥ १३ ऑगस्ट २०१६


१३ ऑगस्ट २०१६
भगवान श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " येती निंदकापाशी । अशेष पापे ॥ " आपण नेहमीच्या स्वभावाने, सवयीने किंवा परिस्थितीची गरज म्हणून का होईना पण एखाद्याची निंदा केली की, आपले पुण्य त्याला जाते व त्याचे पाप आपल्याला लागते. म्हणून याबाबतीत साधकांनी खूप जपायला हवे स्वत:ला. जो तो आपापल्या कर्मांप्रमाणे परतंत्रपणे वागत असतो, म्हणूनच आपण चुकूनही कोणाची निंदा करू नये, असेच सर्व संत सांगतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज तर याही पुढे जाऊन आपल्याला मोलाचे सांगत आहेत की, निंदा सोडा, दुस-यांच्या पापाचा नुसता विचार करणे हेही एकप्रकारचे पापच असून त्यापासून कटाक्षाने आपण दूर राहिले पाहिजे. नाहीतर आपली साधना हकनाकच वाया जाते. हळूहळू श्रीगुरुकृपेने आपले अंत:करण नामामध्ये व हरिप्रेमामध्ये गुंग होऊ लागले की, हे सर्व दोष आपोआपच सुटत जातात, पण आपण स्वत:हून काळजीपूर्वक प्रयत्न केले तर हे लवकर साध्य होते. म्हणूनच या अमृतबोधाचे वारंवार मनन करायला हवे !
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

1 comment:

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates