5 August 2016

॥ अमृतबोध ॥ ५ ऑगस्ट २०१६


५ ऑगस्ट २०१६
परमार्थ हा पूर्णपणे श्रीगुरुकृपेचा विलास असतो. परमार्थाची सुरुवातच श्रीगुरुंच्या कृपेने होते. तोवर चालू असलेली आपली उपासना चूक नसली तरी ती अंधारात चाचपडण्यासारखीच असते. जेव्हा आपल्या उपासनेने श्रीभगवंतांना दया येते तेव्हा मग ते श्रीगुरुरूपाने आपल्यावर कृपा करून आपल्याला नाम देतात. योग्य गुरुपरंपरेने आलेल्या, आत्मज्ञानी श्रीगुरुंकडून मिळालेल्या नामाला ' दिव्य नाम ' म्हणतात. या नामासोबत श्रीगुरुंचा आपल्या परमकल्याणाचा संकल्प कार्यरत असल्याने ते नाम अलौकिक असते व तेच आपला परमार्थ सर्वार्थाने सांभाळून आपल्याला श्रीभगवंतांपर्यंत नेऊन पोचवते. यासाठी अशा अद्भुत नामालाच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे ' परमगुरु ' म्हणून गौरवत आहेत. जोवर हे दिव्यनाम प्राप्त होत नाही, तोवर जशी जमेल तशी पण प्रेमाने व नेमाने यथाशक्य उपासना करीत राहावी, असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. योग्य वेळी श्रीभगवंत कृपा करतातच. 
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates