26 August 2016

॥ अमृतबोध ॥ २६ ऑगस्ट २०१६

२६ ऑगस्ट २०१६
प्रार्थना हा भक्त हृदयाचा सहज आविष्कार आहे. प्रार्थनेत कामनेचा गढूळपणा नसतो की याचनेची अगतिकता नसते. तो तर प्रेमळ व स्वाभाविक अनुकार आहे भक्तीचा ! म्हणूनच श्रीभगवंतांना मनापासून केलेली प्रार्थना, कशीही असली तरी आवडतेच. " नये जरी तुज मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे । नाही तयेवीण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ " असे संत तुकाराम महाराज पण म्हणतात. म्हणूनच प्रार्थना करण्यासाठी केवळ बालकासारखे निष्पाप मन असले की श्रीभगवंतांना कृपा करण्यास तेवढे पुरेसे होते, असा स्वानुभव प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज येथे सांगून आपल्याला हुरूप आणीत आहेत. बाळाचे बोबडे बोल ऐकून आईला पान्हा फुटला नाही, असे झाले आहे का कधीतरी?
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates