16 August 2016

॥ अमृतबोध ॥ १६ ऑगस्ट २०१६

१६ ऑगस्ट २०१६
शारीरिक व मानसिक असे दोन प्रकारचे दु:ख असते. शारीरिक दु:ख योग्य औषधोपचाराने व पथ्याने जाते. पण मानसिक दु:ख हे अधिक व्यापक असल्याने व आपण त्याला फार कवटाळून बसत असल्याने तेवढे सहजपणे जात नाही. म्हणूनच प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, त्यासाठी संतांची संगतीच व्हावी लागते. संतांच्या वाङ्मयाचे वाचन-चिंतन, त्यांच्या बोधाचे मनन, त्यांच्या स्थानांवर सेवा, श्रीसद्गुरूंनी दिलेले नामस्मरण व संतांच्या दिव्य चरित्राचे चिंतन व त्यावर समविचारी साधकांबरोबर बोधप्रद चर्चा; अशा विविध प्रकारांनी संतसंगती साधली जाते. या सत्संगतीने मनात विवेक निर्माण होतो व तो सर्वबाजूंनी आपल्याला सांभाळून पुढे नेतो. या विवेकाच्या बळावरच दु:खाची तीव्रता कमी होत असते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates