13 October 2016

॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही विषयाचे समाधान आपल्याला कधी मिळते? तो भोग चालू असताना ते समाधान कधीच पूर्णत्वाला जात नाही, भोग संपल्यावरच ते पूर्णपणे लाभते. साधे उदाहरण पाहा, आपण पंचपक्वान्नांचे जेवण जेवत आहोत, त्याचे समाधान कधी मिळते? ते जेवण जेऊन पूर्ण झाल्यावरच आपण म्हणतो ना, काय मस्त पोट भरले ! म्हणजे तो भोग संपल्यावर आणि पुढे त्याची कसलीच इच्छाही राहिलेली नसताना आपल्याला खरे समाधान मिळाले. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, खरे समाधान विषयांच्या भोगात नसून त्यांच्या आत्यंतिक वैराग्यातच असते. किंबहुना ते वैराग्य हेच समाधानाचे लक्षण आहे.
विषय आगीसारखे असतात. आगीत कितीही इंधन घाला, ती शांत होत नसते, उलट अधिकच भडकते. तसे विषय कितीही उपभोगा, त्यांची शांती कधीच होत नसते. भोगाने ते प्रचंड वाढतच जातात; आणि जिथे अजून हाव असते तिथे समाधान कधीच नसते.
नेमके हेच लक्षात न घेतल्यामुळे, आपण ऊर फाटेपर्यंत धावपळ करतो आणि ज्या विषयांसाठी एवढे कष्ट करतो त्यांचे समाधानही मग नीट भोगणे आपल्याला शक्य होत नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates