आयुर्वेदानुसार आपले शरीर सात धातूंचे बनलेले आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सात धातूंपासून संपूर्ण शरीर बनते. या धातूंच्या कमी अधिक प्रमाणानुसार शरीराचे आरोग्य ठरते. जे धातू पुष्ट असतात त्यांची लक्षणे आपल्या शरीरावर स्पष्ट दिसतात. या धातूंवरच शरीराचे व मनाचेही स्वास्थ्य अवलंबून असते.
काल आपण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधकांसाठी सांगितलेल्या चार कल्याणप्रद गोष्टी पाहिल्या. त्या गोष्टींचा या धातूंशी देखील महत्त्वाचा संबंध आहे. त्याविषयी प. पू. श्री. मामा सांगतात की, आपल्या धातूंची नुसती पुष्ट असून
भागत नाही, तर त्यांचे ' साम्य ' असणे महत्त्वाचे आहे. धातुसाम्य म्हणजे सर्व धातू सुयोग्य प्रमाणात शरीरात असणे. या साम्यतेसाठीच साधकाने आहार, विहार व विचार यांची मर्यादा, संयमितता व समतोल राखणे फार गरजेचे असते. भगवान श्री माउली अभ्यासयोगात; बोलणे, चालणे, जागणे, झोपणे, खाणे, वागणे इत्यादी सर्व विषयांचे ' मितलेपण ' सांगतात, ते यासाठीच. ' नियमितता ' या शब्दातच ' मितता ' अनुस्यूत आहे !
या धातुसाम्याचा महत्त्वाचा फायदाही ते सांगतात. " येतुलेनि धातुसाम्य संचलें। असेल सुख ॥ज्ञाने.६.१७.३५१॥ " शरीरात धातुसाम्य असेल तरच सुख वाढून समाधानही लाभते. आपल्या चुकीच्या, अतिरेकी वागण्याने ते साम्य बिघडले की अनारोग्य झालेच म्हणून समजावे. त्यामुळे मग दैनंदिन जीवनात अडचणी येतात व पर्यायाने साधनेतही विघ्न येते; म्हणून साधकांनी आहारविहाराची युक्ती जाणून घेऊन हे साम्य प्रयत्नपूर्वक जपलेच पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
26 October 2016
॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
-
शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' : ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत ...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment