26 October 2016

॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६

आयुर्वेदानुसार आपले शरीर सात धातूंचे बनलेले आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सात धातूंपासून संपूर्ण शरीर बनते. या धातूंच्या कमी अधिक प्रमाणानुसार शरीराचे आरोग्य ठरते. जे धातू पुष्ट असतात त्यांची लक्षणे आपल्या शरीरावर स्पष्ट दिसतात. या धातूंवरच शरीराचे व मनाचेही स्वास्थ्य अवलंबून असते.
काल आपण प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधकांसाठी सांगितलेल्या चार कल्याणप्रद गोष्टी पाहिल्या. त्या गोष्टींचा या धातूंशी देखील महत्त्वाचा संबंध आहे. त्याविषयी प. पू. श्री. मामा सांगतात की, आपल्या धातूंची नुसती पुष्ट असून 
भागत नाही, तर त्यांचे ' साम्य ' असणे महत्त्वाचे आहे. धातुसाम्य म्हणजे सर्व धातू सुयोग्य प्रमाणात शरीरात असणे. या साम्यतेसाठीच साधकाने आहार, विहार व विचार यांची मर्यादा, संयमितता व समतोल राखणे फार गरजेचे असते. भगवान श्री माउली अभ्यासयोगात; बोलणे, चालणे, जागणे, झोपणे, खाणे, वागणे इत्यादी सर्व विषयांचे ' मितलेपण ' सांगतात, ते यासाठीच. ' नियमितता ' या शब्दातच ' मितता ' अनुस्यूत आहे !
या धातुसाम्याचा महत्त्वाचा फायदाही ते सांगतात. " येतुलेनि धातुसाम्य संचलें। असेल सुख ॥ज्ञाने.६.१७.३५१॥ " शरीरात धातुसाम्य असेल तरच सुख वाढून समाधानही लाभते. आपल्या चुकीच्या, अतिरेकी वागण्याने ते साम्य बिघडले की अनारोग्य झालेच म्हणून समजावे. त्यामुळे मग दैनंदिन जीवनात अडचणी येतात व पर्यायाने साधनेतही विघ्न येते; म्हणून साधकांनी आहारविहाराची युक्ती जाणून घेऊन हे साम्य प्रयत्नपूर्वक जपलेच पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates