प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेले साधकांचे चार शत्रू व चार मित्र आपण पाहिले. आता साधकांसाठी ते चार कल्याणप्रद गोष्टी सांगत आहेत. अल्प आहार, अल्प निद्रा, नियमित साधना व संयमित विचारपूर्ण बोलणे; या चार गोष्टींचे प्रत्येक साधकाने मनापासून पालन करणे हिताचे असते.
अल्प या शब्दाचा अर्थ आहे, गरजेपुरते, मोजके. अल्प म्हणजे कमी नाही पण जास्तही नाही. भगवान श्री माउली यालाच ' मितले ' म्हणतात. आयुर्वेदही मितभुक् व हितभुक् असेच सांगतो. गरजेपुरते आणि हिताचेच खावे, आवश्यक तेवढी झोप घ्यावीच, मोजके व विचारपूर्वकच बोलावे आणि न चुकता, नियमितपणे, प्रेमादरपूर्वक श्रीगुरूंनी दिलेली साधना करावी; म्हणजे मग आपले नि:संशय कल्याणच होते !
खाणे व झोप यांचा परस्परसंबंध आहे. जास्त खाल्ले की जास्त झोप येते, जास्त झोपेने मन आळशी होते. तमोगुणाची वाढ होऊन दैनंदिन व्यवहाराबरोबर साधनेतही विघ्न येते. अजिबातच न झोपल्यानेही शरीराचे स्वास्थ्य बिघडते व मनही चंचल होते; म्हणून जागरणाचा अतिरेकही टाळला पाहिजे. जास्त बोलल्याने रजोगुण वाढून आपली शक्ती क्षीण होते व नको ते विषय डोक्यात राहतात. लोकांच्या व आपल्या संबंधात वितुष्ट येते, हरिचिंतनाचा अमूल्य वेळ नही नाही ते चिंतन करण्यातच खर्च होतो. म्हणून या तिन्ही गोष्टी टाळणे सर्वच दृष्टींनी हिताचे आहे.
प. पू. श्री. मामा सांगतात ती चार साधकाची अनुष्ठेय आवश्यक कर्तव्येच म्हटली पाहिजेत. हे नियम पाळले की बाकी फार कष्ट करायची आवश्यकता राहात नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
25 October 2016
॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
-
शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' : ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत ...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment