25 October 2016

॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६


प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेले साधकांचे चार शत्रू व चार मित्र आपण पाहिले. आता साधकांसाठी ते चार कल्याणप्रद गोष्टी सांगत आहेत. अल्प आहार, अल्प निद्रा, नियमित साधना व संयमित विचारपूर्ण बोलणे; या चार गोष्टींचे प्रत्येक साधकाने मनापासून पालन करणे हिताचे असते.
अल्प या शब्दाचा अर्थ आहे, गरजेपुरते, मोजके. अल्प म्हणजे कमी नाही पण जास्तही नाही. भगवान श्री माउली यालाच ' मितले ' म्हणतात. आयुर्वेदही मितभुक् व हितभुक् असेच सांगतो. गरजेपुरते आणि हिताचेच खावे, आवश्यक तेवढी झोप घ्यावीच, मोजके व विचारपूर्वकच बोलावे आणि न चुकता, नियमितपणे, प्रेमादरपूर्वक श्रीगुरूंनी दिलेली साधना करावी; म्हणजे मग आपले नि:संशय कल्याणच होते !
खाणे व झोप यांचा परस्परसंबंध आहे. जास्त खाल्ले की जास्त झोप येते, जास्त झोपेने मन  आळशी होते. तमोगुणाची वाढ होऊन दैनंदिन व्यवहाराबरोबर साधनेतही विघ्न येते. अजिबातच न झोपल्यानेही शरीराचे स्वास्थ्य बिघडते व मनही चंचल होते; म्हणून जागरणाचा अतिरेकही टाळला पाहिजे. जास्त बोलल्याने रजोगुण वाढून आपली शक्ती क्षीण होते व नको ते विषय डोक्यात राहतात. लोकांच्या व आपल्या संबंधात वितुष्ट येते, हरिचिंतनाचा अमूल्य वेळ नही नाही ते चिंतन करण्यातच खर्च होतो. म्हणून या तिन्ही गोष्टी टाळणे सर्वच दृष्टींनी हिताचे आहे.
प. पू. श्री. मामा सांगतात ती चार साधकाची अनुष्ठेय आवश्यक कर्तव्येच म्हटली पाहिजेत. हे नियम पाळले की बाकी फार कष्ट करायची आवश्यकता राहात नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates