21 October 2016

॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६

आपण सर्वजण, हे दिसणारे, जाणवणारे जग, यच्चयावत् सगळे काही मायेचाच खेळ आहे. कल्पना हे मायेचे दृश्य रूप, कारण ती स्वत:च कल्पना आहे. म्हणून आपल्याला सतत काही ना काही कल्पना करायची दांडगी सवयच असते. झोपेत सुद्धा आपण कल्पनेचे इमले रचतो, इतकी ही कल्पना मुरलेली आहे आपल्यात. तसेच या वैष्णवी मायेच्या कक्षेत येणा-या प्रत्येक गोष्टीची कोणा ना कोणाला कल्पना ही करता येतेच.
पण याची दुसरी बाजू सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ' अनुभूती ' ही एकच अशी गोष्ट आहे की जी कल्पनेच्या अखत्यारीत येत नसल्याने, कल्पनेच्या पलीकडील आहे. अनुभूती ही मायेच्या खेळाच्या बाहेरची गोष्ट आहे व ती नि:संशय मायाधिपती श्रीभगवंतांच्या प्रसादानेच प्राप्त होणारी असल्याने, आपण तिची कल्पना करू शकत नाही. म्हणूनच अनुभूतीविषयी चर्चाही करता येत नाही, ती ज्याची त्याने घ्यायची असते. ही अनुभूती साधण्याचा एकमात्र राजमार्ग म्हणजेच श्रीगुरूंनी दिलेली साधना होय !
प. पू. श्री. मामांच्या या सांगण्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, परमार्थात काल्पनिक अनुभूतींना थारा नाही. म्हणून साधना करायला लागल्यावर ब-याच साधकांना देवदर्शन, विविध आदेश होणे इत्यादी जे भ्रामक किंवा काल्पनिक अनुभव येतात, ते श्रीगुरूंनी किंवा शास्त्रांनी प्रमाणित केले तरच खरे; नाहीतर ती आपली आपण स्वत:च केलेली घोर फसवणूकच होय, त्याने साधनेचे पार वाटोळे होते, हे विसरता कामा नये.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates