अनुभूती ही अतिशय दुर्मिळ गोष्ट असल्याने त्यासाठी साधनाही तितक्याच प्रमाणात करावी लागते आणि आपण जात्याच अधीर असतो. दम धरण्याची, सबूरीची आपल्याला सवयच नसते. आपली गोष्ट त्या माकडासारखी असते. झाड लावले की मूळ किती वाढले, हे पाहण्यासाठी ते माकड रोज झाड उपटून पाहते. म्हणूनच थोडी साधना झाली आणि काहीच दिव्य अनुभव नाही आला की झाले, आधीच थोडासा असणारा आपला साधनेचा उत्साह पार मावळतो. सगळे अर्थशून्य आहे म्हणून साधना सोडून आपण पुन्हा प्रपंचाचा रसहीन चोथा चघळायला हिरीरीने सुरुवात करतो. हीच आपली सर्वांची मनस्थिती संत नेमकी जाणतात व सतत बाबापुता करून आपले मनोबल वाढवून आपल्याला साधनेत अग्रेसर करीत असतात. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे उपकारच आहेत.
मानवी मनाची ही अधीरता, निर्धाराची कमतरता जाणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांचे मनोधैर्य उंचावत म्हणतात की, अरे, पहिल्याच डुबकीत मोती हाती लागला नाही म्हणून कोणी रत्नांचे आगर असणा-या समुद्रालाच रत्नहीन समजावे का? धीर धरून पुन्हा पुन्हा मनापासून साधना करीत राहिले की, योग्य वेळी साक्षात्काररूपी मोती हाती लागतोच लागतो ! अशी अनुभूती आतूनच लाभली की त्याचक्षणी तोवर केलेल्या सर्व कष्टांचे चीज होऊन धन्यताही लाभते. पण आधीचे ते आवश्यक कष्ट मात्र न रडता, हिंमत न हारता व ख-या प्रेमानेच झाले पाहिजेत. त्यातच शाश्वत कल्याण आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
22 October 2016
॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
-
शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' : ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत ...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
October
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २७ ऑक्टोबर २०१६ श्रीगुरुद्वादशी !!
- ॥ अमृतबोध ॥ २६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ११ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ * जागर आदिशक्तीचा * १० ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ९ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ८ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ७ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ६ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ५ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ४ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** ३ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** २ ऑक्टोबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ** जागर आदिशक्तीचा ** १ ऑक्टोबर २०१६
-
▼
October
(31)
0 comments:
Post a Comment