22 October 2016

॥ अमृतबोध ॥ २२ ऑक्टोबर २०१६

अनुभूती ही अतिशय दुर्मिळ गोष्ट असल्याने त्यासाठी साधनाही तितक्याच प्रमाणात करावी लागते आणि आपण जात्याच अधीर असतो. दम धरण्याची, सबूरीची आपल्याला सवयच नसते. आपली गोष्ट त्या माकडासारखी असते. झाड लावले की मूळ किती वाढले, हे पाहण्यासाठी ते माकड रोज झाड उपटून पाहते.  म्हणूनच थोडी साधना झाली आणि काहीच दिव्य अनुभव नाही आला की झाले, आधीच थोडासा असणारा आपला साधनेचा उत्साह पार मावळतो. सगळे अर्थशून्य आहे म्हणून साधना सोडून आपण पुन्हा प्रपंचाचा रसहीन चोथा चघळायला हिरीरीने सुरुवात करतो. हीच आपली सर्वांची मनस्थिती संत नेमकी जाणतात व सतत बाबापुता करून आपले मनोबल वाढवून आपल्याला साधनेत अग्रेसर करीत असतात. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे उपकारच आहेत.
मानवी मनाची ही अधीरता, निर्धाराची कमतरता जाणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांचे मनोधैर्य उंचावत म्हणतात की, अरे, पहिल्याच डुबकीत मोती हाती लागला नाही म्हणून कोणी रत्नांचे आगर असणा-या समुद्रालाच रत्नहीन समजावे का? धीर धरून पुन्हा पुन्हा मनापासून साधना करीत राहिले की, योग्य वेळी साक्षात्काररूपी मोती हाती लागतोच लागतो ! अशी अनुभूती आतूनच लाभली की त्याचक्षणी तोवर केलेल्या सर्व कष्टांचे चीज होऊन धन्यताही लाभते. पण आधीचे ते आवश्यक कष्ट मात्र न रडता, हिंमत न हारता व ख-या प्रेमानेच झाले पाहिजेत. त्यातच शाश्वत कल्याण आहे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates