16 October 2016

॥ अमृतबोध ॥ १६ ऑक्टोबर २०१६

मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचे मिळून अंत:करण बनते. या चारही वृत्तींचे मूळ अाधार आपले कर्मच असते. प्रारब्धकर्मानुसारच बुद्धी होत असते, मनही त्यानुसारच संकल्प-विकल्प करते, चित्त त्याचेच चिंतन करते व जसे कर्म अाहे तसेच अहंकाराचे स्फुरण होत असते. या चारही वृत्तींचे गुंतलेपण हे आपणच पूर्वी कर्मे करून निर्माण केलेले असल्याने आपणच सर्वस्वी आपल्या अंत:करणाच्या व्यग्रतेला जबाबदार असतो. शिवाय भूतकाळाचा नको इतका विचार व भविष्याची अकारण चिंता करून आपण त्यात कारण नसताना वाढच करत असतो.
आपली साधना या अंत:करणाच्या शांतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. जेवढ्या या वृत्ती शांत, नियमित असतात, तेवढी साधना अधिक आनंददायक व सुखाची होत असते. म्हणूनच प. पू. श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या शांत अंत:करणाचे महत्त्व सांगतात की, आपले अंत:करण जर शांत असेल तर भोवती कितीही गजबज असली तरी आपल्याला निर्जन अरण्यातच असल्याची अनुभूती येते. बाहेरचा कोलाहल मग आपल्याला आत त्रास देऊ शकत नाही. म्हणून आपण प्रत्येक बाबतीतच शांत चित्ताने, सारासार विचार करून वागावे; म्हणजे अंत:करण शांत राहून आपोआपच समाधान बाणते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates